
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘सुरक्षेच्या कारणास्तव, युनिफॉर्मसाठी नवीन डिझाइन केलेले कापड खुल्या बाजारात उपलब्ध होणार नाही. म्हणजेच एकदा कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिल्यानंतर, वेगवेगळ्या आकाराच्या गणवेशांसाठी त्यांना ऑर्डर दिल्या जातील. नंतर ते गणवेश भारतीय सैन्याच्या विविध युनिट्स आणि फॉर्मेशन्सना पाठवले जातील आणि ते तिथे खरेदी करता येतील’. संरक्षण मंत्रालय विविध हवामान परिस्थिती आणि भूप्रदेश लक्षात घेऊन भारतीय सैन्याचा गणवेश बदलण्याची योजना आखत आहे. अति उष्ण आणि शून्य तापमान आणि वापरले जाणारे टेरीकोट कापड वेगवेगळ्या परिस्थितीत सैनिकांसाठी आरामदायक नाही. म्हणून, आता नवीन निवडण्यात आलेले कापड सैनिकांसाठी आरामदायी असेल लक्षात घेऊन अधिक मजबूत आणि हलके असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कपड्यांचा रंग आधीचाच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गणवेश किती वेळा बदलला?
आतापर्यंत तीन वेळा सैन्याचा गणवेश बदलण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्याच वेळी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याचा गणवेश वेगवेगळा असावा, यासाठी बदल करण्यात आले होते. नंतर १९८० मध्ये आणखी एक बदल करण्यात आला आणि त्याला बॅटल ड्रेस असे नाव देण्यात आले. शेवटचा बदल २००५मध्ये, सरकारने ‘सीआरपीएफ’ आणि ‘बीएसएफ’च्या युनिफॉर्मसाठी आर्मी डीपी बॅटल ड्रेस वेगळे करण्यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता.