मोबाईल परत मागितला म्हणून मित्राची हत्या

  69

मुंबई : गाणी ऐकण्यासाठी दिलेला मोबाइल परत मागितल्याच्या रागातून मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपाडा येथे ही घटना घडली असून वॉर्ड बॉय असणाऱ्या सन्मान सावंत याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, सन्मान सुधीर सावंत असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी दिलीपकुमार हरिकिशन राम (वय २४) याला अटक केली आहे. आरोपी दिलीपकुमार आणि मृत सन्मान हे दोघंही एकमेकांचे मित्र असून एकाच परिसरात राहण्यास आहेत.


दोघंही एकत्र फिरत असताना आरोपींचा गाणे ऐकण्यासाठी घेतलेला मोबाइल परत दिला नाही. याचा राग अनावर झाल्याने दोघांमध्ये गुडलक इंजनिअरिंग वर्क्स स्कूलच्या समोर भांडण झाले. त्यावेळी आरोपी दिलीपकुमारने सन्मानला जोरदार धक्का दिला. त्यावेळी सन्मान हा तोल जाऊन रस्त्यावरील गाड्यांमध्ये जाऊन पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला. हे पाहून आरोपी़ने पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या मित्राचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र