मोबाईल परत मागितला म्हणून मित्राची हत्या

मुंबई : गाणी ऐकण्यासाठी दिलेला मोबाइल परत मागितल्याच्या रागातून मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपाडा येथे ही घटना घडली असून वॉर्ड बॉय असणाऱ्या सन्मान सावंत याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, सन्मान सुधीर सावंत असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी दिलीपकुमार हरिकिशन राम (वय २४) याला अटक केली आहे. आरोपी दिलीपकुमार आणि मृत सन्मान हे दोघंही एकमेकांचे मित्र असून एकाच परिसरात राहण्यास आहेत.


दोघंही एकत्र फिरत असताना आरोपींचा गाणे ऐकण्यासाठी घेतलेला मोबाइल परत दिला नाही. याचा राग अनावर झाल्याने दोघांमध्ये गुडलक इंजनिअरिंग वर्क्स स्कूलच्या समोर भांडण झाले. त्यावेळी आरोपी दिलीपकुमारने सन्मानला जोरदार धक्का दिला. त्यावेळी सन्मान हा तोल जाऊन रस्त्यावरील गाड्यांमध्ये जाऊन पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला. हे पाहून आरोपी़ने पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या मित्राचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

Comments
Add Comment

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप