ठाण्यात उद्यापासून मनाई आदेश लागू

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. हे मनाई आदेश १० जानेवारी रोजी १ वाजेपासून २४ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहतील.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राजमाता जिजाऊ भोसले जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, १४ जानेवारी रोजी मकर संक्राती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, बाळासाहेब ठाकरे जयंती होणार आहेत. त्या आनुषंगाने मनाई आदेश लागू केले आहेत.

यामध्ये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, बाळणणे, जमा करणे व तयार करणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादीचा समावेश आहे.
या दरम्यान कोणत्याही इसमाचे चित्र किंवा पुढाऱ्यांच्या चित्र, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे आदींचा यामध्ये समावेश राहणार आहे.

जे सरकारी नोकर आहेत किंवा ज्यांस वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे, त्यांना सदर मनाई आदेश लागू राहणार नाहीत.
दरम्यान लग्न, प्रेत यात्रा, कोर्ट, सरकारी, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका. सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, या ठिकाणी हे आदेश लागू राहणार नाहीत.
मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त, जयजीत सिंह यांनी कळविले आहे.
Comments
Add Comment

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

मुंबईतील २९५ बेकरींवर महापालिकेचा 'प्रहार'; बेकरींना 'पीएनजी-एलपीजी' किंवा इलेक्ट्रिक ओव्हन वापरणे बंधनकारक

मुंबई: स्वच्छ, हरित इंधनाकडे (Cleaner, Green Fuels) वळण्याच्या अनिवार्य आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या शहरातील मोठ्या

मुंबईतील कबूतर प्रकरण चिघळलं; जैन मुनींच्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha : कबुतर आमचं चिन्ह! जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचाही पक्ष असेल; जैन मुनींची घोषणा!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना

ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी नवीन नियमावलीची घोषणा !

मुंबई : महाराष्ट्रातील ॲपवर आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) शिस्तबद्धता, प्रवासी

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील