ठाण्यात उद्यापासून मनाई आदेश लागू

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. हे मनाई आदेश १० जानेवारी रोजी १ वाजेपासून २४ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहतील.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राजमाता जिजाऊ भोसले जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, १४ जानेवारी रोजी मकर संक्राती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, बाळासाहेब ठाकरे जयंती होणार आहेत. त्या आनुषंगाने मनाई आदेश लागू केले आहेत.

यामध्ये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, बाळणणे, जमा करणे व तयार करणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादीचा समावेश आहे.
या दरम्यान कोणत्याही इसमाचे चित्र किंवा पुढाऱ्यांच्या चित्र, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे आदींचा यामध्ये समावेश राहणार आहे.

जे सरकारी नोकर आहेत किंवा ज्यांस वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे, त्यांना सदर मनाई आदेश लागू राहणार नाहीत.
दरम्यान लग्न, प्रेत यात्रा, कोर्ट, सरकारी, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका. सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, या ठिकाणी हे आदेश लागू राहणार नाहीत.
मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त, जयजीत सिंह यांनी कळविले आहे.
Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र