राज्यांतर्गत पारेषण व्यवस्था : हरित ऊर्जा मार्गिका टप्पा-२ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

  102

१२,०३१ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चातून ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट


४५० गिगावॉटच्या स्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट २०३० पर्यंत पूर्ण करण्यास या योजनेमुळे मदत मिळेल


नवी दिल्ली (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयांशी संबंधित मंत्रिमंडळ समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत, हरित ऊर्जा मार्गिका- टप्पा दोनला मंजूरी देण्यात आली. राज्यांतर्गत पारेषण व्यवस्थेसाठी ही योजना राबवली जाणार असून त्याअंतर्गत, सुमारे १०,७५० सर्किट किलोमीटर्स पारेषण लाईन्स आणि वीज उपकेंद्रांमध्ये सुमारे २७,५०० मेगा वोल्ट-अॅम्पियर (MVA) वीज इतकी क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे.


सुमारे 12,031.33 कोटी रुपये निधी खर्च करुन, ही योजना राबवली जाणार असून त्यात केंद्र सरकारचा आर्थिक वाटा 33 टक्के म्हणजेच 3970.34 कोटी इतका असणार आहे.


पारेषण व्यवस्था पाच वर्षांमध्ये म्हणजेच, 2021-22 ते 2025-26 या कालावधीत निर्माण केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक सहायातून, पारेषण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या इतर पायाभूत सुविधा उभारल्या जातील आणि त्यातून ऊर्जेचा खर्च कमी होईल. याचाच अर्थ, सरकारच्या सहाय्याचा लाभ, देशातील नागरिकांना मिळेल.


या योजनेमुळे 2030 पर्यंत 450 गिगावॉट अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासही मदत होणार आहे.


देशात दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा निर्माण करण्यात तसेच, कार्बन उत्सर्जन कमी करुन, पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासही यामुळे मदत मिळेल. या योजनेमुळे, कुशल तसेच अकुशल अशा दोन्ही कामगारांसाठी, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि तामिळनाडू अशा राज्यात याआधीपासूनच अंमलबजावणी सुरु असलेल्या जीईसी- टप्पा- 1 च्या योजनेव्यतिरिक्त ही नवी योजना राबवली जाणार आहे. 24 गिगावॉट आणि अक्षय ऊर्जानिर्मिती 2022 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. या योजनेमुळे 9700 सीकेएम च्या अतिरिक्त पारेषण लाईन्स आणि उपकेंद्रामध्ये 22600 एम व्ही ए क्षमता निर्माण केली जाणार आहे. या पारेषण प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 10,141.68 रुपये इतका असून, त्यापैकी 4056.67 कोटी रुपये खर्च केंद्र सरकार करणार आहे.

Comments
Add Comment

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन