काश्मीरमध्ये जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या बडगाममधील जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अद्याप चकमक सुरु असून आणखी काही दहशतवादी लपून बसले असल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.


काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ते जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.


https://twitter.com/ANI/status/1479300659337854978?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1479300659337854978%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fthree-terrorist-killed-in-kashmir-by-security-forces-ssy93

बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी रात्री चकमक सुरु झाली. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात जोलवा गावात शोधमोहिम सुरु केली होती. त्यात दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाल्यानतंर प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलाने गोळीबार केला. एकजण श्रीनगरमधील असून वसिम असे त्याचे नाव आहे.


याआधी पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. ते तिघेही जैश ए मोहम्मदशी संबंधित होते आणि त्यात एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश होता.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे