वाडा : कोकाकोला कंपनी प्रशासन व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी बुधवारपासून वाडा तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या झेंड्याखाली बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने न घेतल्याने तिसऱ्या दिवशी सकाळी कामगारांनी मुंडन आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, उप सहाय्यक आयुक्त, कंपनी प्रशासन, कामगार नेते व कामगार यांची शुक्रवारी दुपारी तहसीलदारांनी बोलवलेल्या बैठकीत मागण्यांबाबत एकमत न झाल्याने बोलणी फिस्कटली.त्यामुळे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.
तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शितपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत स्थानिक भुमिपूत्र कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.कंपनी प्रशासन व ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरु असून ठेकेदाराने कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत. या व इतर मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार ५ जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र दुसऱ्या दिवशीही कंपनी प्रशासन किंवा कामगार आयुक्त प्रशासन या आंदोलनाकडे फिरकले नाहीत.त्यामुळे कंपनी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी सकाळी कामगारांनी आंदोलनस्थळीच मुंडन करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
दरम्यान,आज दुपारी निवासी नायब तहसीलदार सुनील लहांगे यांनी कोकाकोला कंपनीचे व्यवस्थापक रूपेश परदेशी, संदीप वेखंडे, ठेकेदार धनंजय चौधरी, उप सहाय्यक आयुक्त दिपक बोडके,पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, संघटनेचे नेते जितेश पाटील, रविंद्र मेणे व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मागण्यांबाबत कामगारांत एकमत न झाल्याने बोलणी फिस्कटली त्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…