Share

राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!

एके दिवशी असा अद्भुत चमत्कार घडला की, भालचंद्र रात्री घरात झोपले असता सुमारे बाराच्या सुमारास तो झोपेतून उठून बिछान्यावर बसला व मोठमोठ्याने टाळ्या वाजवून ‘‘श्रीराम जयराम जय जय राम, ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या महान मंत्राचा मोठमोठ्याने नामघोष करू लागले. घरातील व शेजारीपाजारी सर्व मंडळी जागी होऊन आश्चर्यचकित झाली. त्यांनी त्यांची नानाप्रकारे विचारपूस करून पाहिली पण व्यर्थ! ते डोळे मिटून पाषाणासारखे बसले होते. हा हा म्हणता ही गडबड ऐकून गावातील सर्व मंडळी तिथे जमली व एकाएकी हा काय प्रकार घडला, या विचाराच्या जाळ्यात सर्व मंडळी गुरफटून त्याच्याकडे पाहत होती; परंतु भालचंद्रांचा रामनामाचा घोष यंत्रासारखा चालू होता.

अशी ही त्याची आश्चर्यकारक स्थिती पाहून अनेकांनी अनेक तर्क काढले. कोणी म्हणाला, यांना साक्षात्कार झाला, तर दुसरा म्हणाला, त्यांना भूतबाधा झाली. म्हणून त्यांच्यावर नाना प्रकारचे इलाज करून पाहिले. गंडे, दोरे बांधून पाहिले. असे होता होता आठ दिवस लोटले; परंतु भालचंद्रांत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी हळूहळू खाणेपिणे सर्व व्यर्ज्य केले. सतत नामजप चालू ठेवला.

संत रामदास स्वामींच्या जीवनात त्यांच्या बालपणात असाच प्रकार घडला होता. दासांनी आपल्या मोठ्या बंधूजवळ मला गुरुमंत्र द्या, असा हट्ट धरला होता; परंतु तुझे वय लहान असल्याने तुला मंत्रोपदेश देता येत नाही. असे त्यांनी सांगितले असता, रामदास रागाने देवळात जाऊन झोपला. तिथे योग असा आला की, बाल रामदासाची भगवंताला दया येऊन त्याने त्यांना झोपेतून उठवून ‘श्रीराम जयराम जय जय राम’ असा महामंत्र दिला. रामदास मोठमोठ्याने तो जप करू लागले तेव्हा सर्व मंडळी अशीच आश्चर्यचकित झाली होती.
तीच अवस्था भालचंद्रांची झाली. गावातील लोक फार हळहळले. कारण, आपल्या सात्त्विक गुणामुळे आणि अचूक ज्योतिषाने त्यांनी अलोट लोकप्रियता संपादन केली होती.
(क्रमश:)
राजाधिराज श्री
भालचंद्र महाराज की जय!

Recent Posts

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

40 seconds ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

35 minutes ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

1 hour ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

2 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

9 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

9 hours ago