कुडूस येथील डेअरी, दुध उत्पादक शेतकरी ‘स्वाभिमान’च्या झेंड्याखाली

कुडूस :तालुक्यातील कुडूस विभागातील दुध डेअरी व दुध उत्पादक शेतकरी संघटीत होऊन स्वाभिमान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत. कुडूस येथे गुरुवारी सायंकाळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील व तालुकाध्यक्ष रवींद्र मेणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुध डेअरी व दुध उत्पादक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुडूस विभागातील ४२ दूध उत्पादक शेतकरी हे स्वाभिमान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत.



तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी दुध उत्पादक व दुध डेअरी हा शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. हा व्यवसाय करत असतांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे. कोरोनाच्या कठीण काळात हजारो लिटर दूध वाया गेले. अवकाळी पावसामुळे जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा भिजून पूर्णता वाया गेला. तर जनावरांचे खाद्य महागले असल्याने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आम्ही या संघटनेचे सदस्यत्व स्विकारले असल्याचे उपस्थितीत दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध

फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेल रूममधल्या 'त्या' शेवटच्या क्षणांचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमकं काय घडलं?

फलटण : महाराष्ट्रातील फलटण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह