कुडूस येथील डेअरी, दुध उत्पादक शेतकरी ‘स्वाभिमान’च्या झेंड्याखाली

  80

कुडूस :तालुक्यातील कुडूस विभागातील दुध डेअरी व दुध उत्पादक शेतकरी संघटीत होऊन स्वाभिमान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत. कुडूस येथे गुरुवारी सायंकाळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील व तालुकाध्यक्ष रवींद्र मेणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुध डेअरी व दुध उत्पादक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुडूस विभागातील ४२ दूध उत्पादक शेतकरी हे स्वाभिमान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत.



तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी दुध उत्पादक व दुध डेअरी हा शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. हा व्यवसाय करत असतांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे. कोरोनाच्या कठीण काळात हजारो लिटर दूध वाया गेले. अवकाळी पावसामुळे जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा भिजून पूर्णता वाया गेला. तर जनावरांचे खाद्य महागले असल्याने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आम्ही या संघटनेचे सदस्यत्व स्विकारले असल्याचे उपस्थितीत दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक