भिवंडीत एका रात्रीत आगीच्या तीन घटना

  75

भिवंडी : भिवंडी ग्रामीण भागात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत आगीच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.



गुरुवारी सायंकाळी दापोडा ग्रामपंचायत क्षेत्रात मोजे बनविणाऱ्या सॉक्सक्को या कारखान्यास आग लागण्याची घटना घडली असतानाच मध्यरात्री नंतर पहाटे मुंबई नाशिक महामार्गावर वडपे ग्रामपंचायात हद्दीत एका फर्निचर बनविणाऱ्या लाकूड कंपनीमध्ये आग लागण्याची घटना घडली.



मध्यरात्री नंतर सुमारे पावणे दोनच्या सुमारास मेहंदी हसन चौधरी यांच्या मालकीच्या एका प्लायवूड व लाकडाचे ओंडके असलेल्या गाळ्याला आग लागल्याची घटना घडली. यावेळी गोदामात झोपलेले रिंकूराज नारायण, (वय २४), राजगौतम विश्वकर्मा (वय २२) हे दोन कामगार अडकून पडले होते. स्थानिक नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन्ही कामगारांना भाजलेल्या जखमी अवस्थेत बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. या आगीवर सकाळी ९ च्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.


तर दापोडा ग्रामपंचायात हद्दीतील मानस पेट्रोल पंपाजवळ पारसनाथ कॉम्प्लेक्स मधील एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची