सिटी पार्कच्या कामाच्या दर्जाबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील असमाधानी

कल्याण : केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी अंतर्गत चाललेल्या कामांच्या पाहणीदौऱ्या करिता केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे कल्याण पश्चिममध्ये आले होते. स्मार्टसिटी अंतर्गत सिटीपार्कच्या कामाची पाहणी केली असता, सिटी पार्कच्या कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.



सिटी पार्कच्या कामाची गुणवत्ता आणि हे काम कोणासाठी आणि कशासाठी आहे हा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी संबंधित ठेकेदार आणि महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी तसेच पालिका अधिकारी यांच्याशी सल्ला-मसलत करून, सिटी पार्कच्या कामाचा दर्जा योग्यरीत्या व्हावा असे निर्देश दिले. आणि संत गतीने सुरू असल्याने कामावरही नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांसाठी सिटी पार्क लवकरात लवकर खुला व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र शासनाच्या निधीतून असलेल्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या कामांचा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आढावा घेतला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थिती बद्दल केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत देशभरातील महत्वाच्या शहरांना उत्तम व आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. या अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार टाऊन पार्क व सिटी पार्क विकसित करणे, काळा तलाव व परिसराचे सुशोभीकरण, कल्याण स्टेशन परिसर सुधारणे अशी अनेक कामे सुरु आहेत. या कामांचा आढावा घेऊन त्यांची सद्यस्थिती काय आहे, कामे पूर्ण होण्यास येणारे अडथळे यांची माहिती मंत्री कपिल पाटील यांनी घेतली.



यावेळी कपिल पाटील यांनी कल्याण रेल्वे स्थानक, भगवा तलाव, सिटी पार्क (गौरीपाडा) तसेच वाडेघर सर्कल ते रिंग रोड ते बारावे- आंबिवली- टिटवाळा या ठिकाणी स्वतः पाहणी करून संपूर्ण माहिती घेतली. ही कामे योग्य वेळेत पूर्ण व्हावीत जेणेकरून आपण मोदीजींच्या स्वप्नातील स्मार्ट शहरे उभारू शकू, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.









Comments
Add Comment

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे

'जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण

शिवडीत सिलेंडर स्फोट, गुरुकृपा चाळीत अग्नितांडव; ५ ते ६ घरे जळून खाक

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण