अव्वल मानांकित ओम कदमचे जेतेपद निश्चित

मुंबई  : मुंबईच्या अग्रमानांकित आणि इंडिया कॅडेट ओम कदमने सहाव्या आयआयएफएल मुंबई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या ज्युनियर गटात एक फेरी बाकी असतानाच सलग ८ विजयांसह ८ गुणांची कमाई करीत जेतेपदावर आपल्या नावाची मोहोर उमटवली. कफ परेड येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत ओमने आठव्या फेरीत रघुराम रेड्डीवर ५७ व्या चालीतच शानदार विजय मिळवत यंदाचे जेतेपद मिळवले. खुल्या गटात अर्जुन आदिरेड्डीने ६.५ गुणांची कमाई करीत आघाडी घेतली.



ज्युनिअर गटातील दुसऱ्या पटावर दुसऱ्या स्थानी असणारा गौरांग बागवे आणि जयवीर महेंद्रू यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोघांनीही एकमेकांना शह- प्रतिशह देत लढतीत चुरस आणली. सिसिलिअन ओपनिंगचा वापर झालेल्या या लढतीत गौरांगने सातव्या चालीत जयवीरचे प्यादे मारले. पण जयवीरने अफलातून प्रतिहल्ला चढवत गौरांगच्या राजालाचा धोका निर्माण केला. त्यामुळे गौरांगला बरोबरी स्वीकारावी लागली. गौरांग आणि जयवीर या दोघांचेही ६.५ गुण झाले असून त्यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस आहे.



ओपन गटात तिसऱ्या पटावर खेळताना अर्जुन आदिरेड्डीने ५०व्या चालीत दर्शील काजरोळकरला पराभूत करीत शानदार विजय मिळवला. त्यानंतर अर्जुनने कालचा आघाडीवीर पूर्वीं अय्यरला बरोबरीत रोखत ६.५ गुणांसह आघाडी घेतली. त्याच्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, रचित गुरनानी, अरविंद अय्यर, रित्विक कृष्णन, ऋतुराज धोत्रे हे पाच बुद्धिबळपटू ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. या स्पर्धेची रंगत आता अधिकच वाढली आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण