जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोना

  60

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असलेल्या भारती पवार यांचा यात समावेश असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती किती चिंताजनक आहे हेदेखील या निमित्ताने अधोरेखीत होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे.

आता तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही या प्रादुर्भावामुळे बाधित होत आहेत. नाशिक जिल्ह्याला भूषणावह असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारती पवार यांना देखील कोरोना महामारीची बाधा झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांच्या हस्ते १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ नाशिक शहरातील बिटको रुग्णालयात करण्यात आला होता. त्यानंतर त्या सुरत येथे दौऱ्याला गेल्या आणि नाशिक शहरातही त्यांनी भरगच्च कार्यक्रम केले होते. त्यामुळे आता अजून कोणाकोणाला बाधा झाली आहे का, याबाबत तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात विक्रम करणारे आणि लोकप्रिय असलेले खासदार हेमंत गोडसे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. मागील दोन दिवसांपासून ते देखील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत होते. ते मुंबईला व्यवसायिक बैठकांसाठी गेले होते. त्यापूर्वी शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या