जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोना

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असलेल्या भारती पवार यांचा यात समावेश असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती किती चिंताजनक आहे हेदेखील या निमित्ताने अधोरेखीत होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे.

आता तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही या प्रादुर्भावामुळे बाधित होत आहेत. नाशिक जिल्ह्याला भूषणावह असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारती पवार यांना देखील कोरोना महामारीची बाधा झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांच्या हस्ते १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ नाशिक शहरातील बिटको रुग्णालयात करण्यात आला होता. त्यानंतर त्या सुरत येथे दौऱ्याला गेल्या आणि नाशिक शहरातही त्यांनी भरगच्च कार्यक्रम केले होते. त्यामुळे आता अजून कोणाकोणाला बाधा झाली आहे का, याबाबत तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात विक्रम करणारे आणि लोकप्रिय असलेले खासदार हेमंत गोडसे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. मागील दोन दिवसांपासून ते देखील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत होते. ते मुंबईला व्यवसायिक बैठकांसाठी गेले होते. त्यापूर्वी शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये