'बुली बाई'ऍप तयार करणाऱ्यास आसामहून अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने ‘बुली बाई’ऍप तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला आसाम येथून अटक केली आहे. डीसीपी केपीएस मल्होत्रा यांच्या पथकाने ही अटक केली आहे. या आरोपीचं नाव नीरज असून हा गिथहब वरून अॅप बनवणारा मुख्य आरोपी आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नीरजने बुली बाईला गिथहब अॅपद्वारे बनवले होते.

नीरज हा गिथहबवर बुली बाई अॅप तयार करणारा हा मुख्य आरोपी आहे. आरोपी नीरज बिश्नोई हा सुमारे 21 वर्षांचा आहे. यापूर्वी, दिल्ली महिला आयोगाने 'बुली बाई' आणि 'सुली डील' अॅप्सवरील आक्षेपार्ह सामग्रीच्या चौकशीच्या संदर्भात या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली पोलिसांना हजर राहण्यास सांगितले आहे. दिल्ली महिला आयोगाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, 'गिटहब' अॅपवर अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय अपलोड केल्याबद्दल मीडिया रिपोर्ट्सची स्वतःहून दखल घेतली. आयोगाने दिल्ली पोलिसांना हजर राहून 'सुली डील' आणि 'बुली बाई' प्रकरणात अटक केलेल्यांची यादी करण्यास सांगितले.

दिल्ली महिला आयोगाने जारी केलेल्या आवेदनात म्हणले आहे की, अशा गंभीर प्रकरणातील आरोपींना अटक न होणे हे अस्वस्थ करणारे आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींच्या या भूमिकेमुळे महिला आणि मुलींची ऑनलाइन विक्री आणि इतरांना शिक्षा झालेल्यांचे मनोबल वाढले आहे. काही अज्ञात लोकांच्या गटाने 'गिटहब' वापरून शेकडो मुस्लिम महिला आणि मुलींचे मॉर्फ केलेले फोटो एका अॅपवर अपलोड केले आहेत आणि ते 'बुली डील ऑफ द डे' म्हणून शेअर केले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत