भिवंडीत भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड

मोनिश गायकवाड



भिवंडी : भिवंडी तालुक्यात सध्या दुगाडफाटा येथील एकमेव भातखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.
दुगाडफाटा येथील भातखरेदी केंद्रावर तब्बल २२०० शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत ६५० शेतकऱ्यांचे १६ हजार क्विंटल भात खरेदी केल्याची माहिती गोदाम व्यवस्थापक लहू घोडविंदे यांनी देत ३१ जानेवारीपर्यंत भात खरेदीस शासनाने परवानगी दिल्याने या काळात आपला भात विक्री होणार नाही, या भीतीने शेतकरी भात घेऊन केंद्रावर दाखल होत आहेत, अशी महिती घोडविंदे यांनी दिली.



भिवंडी तालुक्यातील कांबे, जू नांदूरखी, पडघा, बापगाव, लोनाड, अंबाडी, दिघाशी, चिंबीपाडा या भागात आजही मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जात असून त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह होत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देऊन भात खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर खरेदीविक्री महासंघास शेतकऱ्यांना कडील साधारण प्रतीचा भात १९४० रुपये प्रति क्विंटल हमीभाव देऊन ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला असताना भिवंडीत भातखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.



तालुक्यातील हिवाळी शेतीमाल खरेदी-विक्री सहकारी सोसायटी लि. व झिडके येथील जय किसान भात गिरणीच्या झिडके व पडघा अशा तीन ठिकाणी या दोन सहकारी संस्थांना भात खरेदीसाठी खरेदी-विक्री संघाने मान्यता दिली असून झिडके पडघा येथील गोदामांची क्षमता कमी असल्याने तेथील भात खरेदी बंद असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दुगाडफाटा येथे वळविल्याने या ठिकाणी खरेदी केलेला भात साठवणुकीची सुद्धा गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Comments
Add Comment

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मुंबई : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग च्या विविध

'वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप मागे घेतला'

मुंबई : अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच

'पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करावा'

मुंबई :  कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने

'अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करावी'

मुंबई : अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमान गढी

कोल्हापूरमध्ये ३४.३६ हेक्टरवर होणार आयटी पार्क

मुंबई : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन

धारावीतील ४३६ झोपडपट्टीधारकांचे देवनार येथे पुनर्वसन

मुंबई : धारावी येथे १९९९ साली लागलेल्या भीषण आगीत बाधित झालेल्या ‘राजीव गांधी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण