भिवंडीत भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड

मोनिश गायकवाड



भिवंडी : भिवंडी तालुक्यात सध्या दुगाडफाटा येथील एकमेव भातखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.
दुगाडफाटा येथील भातखरेदी केंद्रावर तब्बल २२०० शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत ६५० शेतकऱ्यांचे १६ हजार क्विंटल भात खरेदी केल्याची माहिती गोदाम व्यवस्थापक लहू घोडविंदे यांनी देत ३१ जानेवारीपर्यंत भात खरेदीस शासनाने परवानगी दिल्याने या काळात आपला भात विक्री होणार नाही, या भीतीने शेतकरी भात घेऊन केंद्रावर दाखल होत आहेत, अशी महिती घोडविंदे यांनी दिली.



भिवंडी तालुक्यातील कांबे, जू नांदूरखी, पडघा, बापगाव, लोनाड, अंबाडी, दिघाशी, चिंबीपाडा या भागात आजही मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जात असून त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह होत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देऊन भात खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर खरेदीविक्री महासंघास शेतकऱ्यांना कडील साधारण प्रतीचा भात १९४० रुपये प्रति क्विंटल हमीभाव देऊन ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला असताना भिवंडीत भातखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.



तालुक्यातील हिवाळी शेतीमाल खरेदी-विक्री सहकारी सोसायटी लि. व झिडके येथील जय किसान भात गिरणीच्या झिडके व पडघा अशा तीन ठिकाणी या दोन सहकारी संस्थांना भात खरेदीसाठी खरेदी-विक्री संघाने मान्यता दिली असून झिडके पडघा येथील गोदामांची क्षमता कमी असल्याने तेथील भात खरेदी बंद असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दुगाडफाटा येथे वळविल्याने या ठिकाणी खरेदी केलेला भात साठवणुकीची सुद्धा गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.