वेलिंग्टन : पहिली कसोटी ८ विकेटनी जिंकताना बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाहुण्यांचा जगज्जेते यजमानांवरील हा पहिलाच मालिका विजय आहे.
मध्यमगती गोलंदाज इबादत होसेनच्या दुसऱ्या डावातील ६ विकेट तसेच पहिल्या डावातील सलामीवीर महमुदुल हसन जॉय, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील अनुक्रमे नजमुल होसेन शांतो आणि कर्णधार मोमिनुल हक तसेच मधल्या फळीतील लिटन दासची दमदार अर्धशतके बांगलादेशच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
पहिल्या डावातील १३० धावांची आघाडीही पाहुण्यांसाठी जमेची बाजू ठरली. पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारणाऱ्या यजमानांची फलंदाजी दुसऱ्या डावात ढेपाळली. चौथ्या दिवसअखेर ५ बाद १४७ धावा करणाऱ्या न्यूझीलंडचा दुसरा डाव पाचव्या आणि अंतिम दिवशी १६९ धावांवर आटोपला. त्यांच्या तळातील पाच फलंदाजांना आणखी २२ धावांची भर घालता आली. इबादत होसेनने न्यूझीलंडचे शेपूट फार वळवळू दिले नाही. बुधवारी यजमानांचा डाव १०.४ षटके चालला. त्यानंतर बांगलादेशसमोर ४० धावाचे माफक लक्ष्य राहिले. पाहुण्यांनी सलामी जोडीच्या बदल्यात आव्हान पार केले.
दुसऱ्या डावात यजमानांना हादरवणारा इबादत होसेनला (एकूण ७ विकेट) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दुसऱ्या डावातील ४६ धावांतील ६ विकेट ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. विजयी सलामीसह बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघांमधील दुसरी आणि अंतिम कसोटी रविवारपासून (९ जानेवारी) ख्राइस्टचर्च येथे खेळली जाणार आहे.
ऐतिहासिक विजयासह बांगलादेशने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्लूटीसी) स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली.
डब्लूटीसीमध्ये ३६ गुण असले तरी शंभर टक्के विजयांमुळे ऑस्ट्रेलिया संघ ताज्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. २४ गुण असलेला श्रीलंका संघ आणि ३६ गुण असलेला पाकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक ५३ गुण मिळवूनही ६३.०९ अशा टक्केवारीमुळे भारताने चौथे स्थान राखले आहे.
सलग १७ सामन्यांची विजयी मालिका खंडित
बुधवारच्या पराभवानंतर न्यूझीलंडची मायदेशातील सलग १७ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंडला मालिका पराभव टाळण्यासाठी विजय आवश्यक आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…