जे. जे. रुग्णालयातील ६१ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता जे. जे. रुग्णालयातील तब्बल ६१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून ही माहिती देण्यात आली आहे. आधीच निवासी डॉक्टरांची संख्या कमी असून कोरोनामुळे अनेकजण कर्तव्यावर नसल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे, असे मार्डचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश दहिफळे यांनी सांगितले.



राज्यात २२१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण


पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नीटचे समुपदेशन रखडल्याने २७ नोव्हेंबरपासून देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देशातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले होते.


“डॉक्टरांची कमतरता असल्याने ओपीडी सुरळीत चालत नाही आहेत. गेल्या ४८ तासात १२० डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय अजून काही जणांना लागण होऊन ही संख्या वाढण्याची भीती आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या संचालक मंडळाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे,” अशी मागणी डॉक्टर अविनाश दहिफळे यांनी केली आहे.


“मनुष्यबळ पुन्हा भरण्याच्या आश्वासनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. आमच्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत असताना आम्ही ६० टक्के मनुष्यबळासोबत काम करत आहोत. हे डॉक्टर रुग्णालय, घरांमध्ये विलगीकरणात आहेत,” असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा