पावसामुळे ४३ षटकांचा खेळ वाया

सिडनी (वृत्तसंस्था): अॅशेस क्रिकेट मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला. ओले मैदान तसेच अंधुक प्रकाशामुळे ४३ षटकांचा खेळ वाया गेला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३ बाद १२६ धावा केल्यात.



पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवशी आघाडी फळीचे संयमी योगदान आणि दोन अर्धशतकी भागीदाऱ्या हे यजमानांच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. अनुभवी डेव्हिड वॉर्नरने (३० धावा) मार्कस हॅरिससह (३८ धावा) ऑस्ट्रेलियाला ५१ धावांची दमदार सलामी दिली. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला बाद करताना सलामी फोडली. त्यानंतर हॅरिसने मॅर्नस लॅबुशेनला (२८ धावा) हाताशी धरून यजमानांचे शतक फलकावर लावले. मात्र, तिसऱ्या सत्रात हे दोन्ही स्थिरावलेले फलंदाज बाद करण्यात अनुक्रमे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि मार्क वुडला यश आले.



तत्पूर्वी, यजमान कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पावसामुळे उशीराने खेळ सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. मात्र, पाचव्या षटकात पावसामुळे खेळ थांबला. त्यानंतर उघडीप मिळाल्याने पुन्हा खेळाला सुरुवात झाली. परंतु, पाऊस पुन्हा प्रकटला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १३.३ षटकांत बिनबाद १३ धावा झाल्या होत्या. पाऊस कायम राहिल्याने त्याच वेळी उपाहारासाठी खेळ थांबवण्यात आला.




Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी