पावसामुळे ४३ षटकांचा खेळ वाया

  67

सिडनी (वृत्तसंस्था): अॅशेस क्रिकेट मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला. ओले मैदान तसेच अंधुक प्रकाशामुळे ४३ षटकांचा खेळ वाया गेला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३ बाद १२६ धावा केल्यात.



पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवशी आघाडी फळीचे संयमी योगदान आणि दोन अर्धशतकी भागीदाऱ्या हे यजमानांच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. अनुभवी डेव्हिड वॉर्नरने (३० धावा) मार्कस हॅरिससह (३८ धावा) ऑस्ट्रेलियाला ५१ धावांची दमदार सलामी दिली. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला बाद करताना सलामी फोडली. त्यानंतर हॅरिसने मॅर्नस लॅबुशेनला (२८ धावा) हाताशी धरून यजमानांचे शतक फलकावर लावले. मात्र, तिसऱ्या सत्रात हे दोन्ही स्थिरावलेले फलंदाज बाद करण्यात अनुक्रमे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि मार्क वुडला यश आले.



तत्पूर्वी, यजमान कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पावसामुळे उशीराने खेळ सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. मात्र, पाचव्या षटकात पावसामुळे खेळ थांबला. त्यानंतर उघडीप मिळाल्याने पुन्हा खेळाला सुरुवात झाली. परंतु, पाऊस पुन्हा प्रकटला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १३.३ षटकांत बिनबाद १३ धावा झाल्या होत्या. पाऊस कायम राहिल्याने त्याच वेळी उपाहारासाठी खेळ थांबवण्यात आला.




Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी