पावसामुळे ४३ षटकांचा खेळ वाया

सिडनी (वृत्तसंस्था): अॅशेस क्रिकेट मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला. ओले मैदान तसेच अंधुक प्रकाशामुळे ४३ षटकांचा खेळ वाया गेला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३ बाद १२६ धावा केल्यात.



पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवशी आघाडी फळीचे संयमी योगदान आणि दोन अर्धशतकी भागीदाऱ्या हे यजमानांच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. अनुभवी डेव्हिड वॉर्नरने (३० धावा) मार्कस हॅरिससह (३८ धावा) ऑस्ट्रेलियाला ५१ धावांची दमदार सलामी दिली. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला बाद करताना सलामी फोडली. त्यानंतर हॅरिसने मॅर्नस लॅबुशेनला (२८ धावा) हाताशी धरून यजमानांचे शतक फलकावर लावले. मात्र, तिसऱ्या सत्रात हे दोन्ही स्थिरावलेले फलंदाज बाद करण्यात अनुक्रमे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि मार्क वुडला यश आले.



तत्पूर्वी, यजमान कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पावसामुळे उशीराने खेळ सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. मात्र, पाचव्या षटकात पावसामुळे खेळ थांबला. त्यानंतर उघडीप मिळाल्याने पुन्हा खेळाला सुरुवात झाली. परंतु, पाऊस पुन्हा प्रकटला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १३.३ षटकांत बिनबाद १३ धावा झाल्या होत्या. पाऊस कायम राहिल्याने त्याच वेळी उपाहारासाठी खेळ थांबवण्यात आला.




Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक