
कर्नाटक सरकारकडून कोगनोळी टोल नाक्यावर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करून परत पाठवले जात आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्यांमधील प्रवेशाबाबत काही निकष घालून दिलेले आहेत. दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असा निकष आहे. दोन डोस झाले असतील देशात, परदेशात कुठेही फिरता येते, मग कर्नाटकात प्रवेश का दिला जात नाही? कर्नाटकमध्ये नागरिकांना रोज ये-जा करावी लागते, व्यवहार करायचे असतात. गडहिंग्लज, चंदगडला कोगनोळीवरून जावे लागते. असे असताना राष्ट्रीय महामार्ग बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करणार आहे.