जिल्ह्यात सर्वत्र किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाचा शुभारंभ

पालघर : १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास आजपासून सुरुवात झाली असून चहाडे येथील स्वर्गीय श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालय येथे जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, पालघर पं. स. सभापती रंजना म्हसकर, जि. प. सदस्य नीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सानिका रजनीकांत पाटील, विश्रामपूर या १५ वर्षीय आशा स्वयंसेविकेच्या मुलीस लस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
शाळा आणि महाविद्यालयापासून लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार असून १५ ते १८ वयोगटातील एकूण १ लाख ६८ हजार ९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी डॉ. अभिजित खंदारे यांनी दिली.



सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी हा शुभारंभ होत असून ही आनंदाची गोष्ट आहे. आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी स्वयंसेविका यांच्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल, असे मत यावेळी अध्यक्ष वाढाण यांनी व्यक्त केले. तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण गरजेचे असून लसीकरणाबाबत कुठलीही भीती मनात बाळगू नका, असे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगून कोरोनाची तिसरी लाट आपण थोपवू शकतो, असा विश्वास व्यक्त करून रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळा आणि कुठल्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैदेही वाढाण यांनी केले.



लहानपणी जे लसीकरण झाले आहे त्याचाच हा भाग असून आता कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.



यानंतर मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी करून लवकरात लवकर इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे, अशा सूचना अध्यक्ष वाढाण यांनी केल्या. यावेळी चहाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.



Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा