नवी मुंबईतील वातानुकूलित बसेसना घरघर

नवी मुंबई : नवी मुंबईत वातानुकूलित बसेस मनपा परिवहन उपक्रमाकडून कार्यान्वित करण्यात आल्या. त्याविषयी नागरिकांनी तसेच प्रवाशांनी देखील परिवहन उपक्रमाचे कौतुक केले; परंतु आता याच बसेसची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्याने बसेस नादुरुस्त होण्याच्या घटनांना वेग आला आहे. त्यामुळे कौतुक करणारे प्रवासीच आता परिवहन उपक्रमावर टीकास्त्र करत आहेत.

निळयाभोर दिसणाऱ्या बसेस शहराला शोभून दिसत आहेत. नवी मुंबईमधील स्वच्छ, सुंदर रस्त्यावर पळताना या बसेस अकर्षकतेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. प्रवाशांचा उदंड प्रतिसाद देखील त्यांना लाभताना दिसून येत आहे; परंतु एक ते दीड वर्ष पूर्ण कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच या बसेसना काहीना काही आजाराने त्रासले असल्याचे सामोरे आले आहे.

मनपा परिवहन उपक्रमात एकूण १८० बसेस असून त्यामध्ये १०५ मोठ्या बसेस, तर ७५ छोट्या बसेस आहेत. या सर्व बसेस उपक्रमाच्या तीनही आगारात प्रवाशांना सेवा देत आहेत. पण आज या बसेस कोणत्याही ठिकाणी बंद पडत आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

बसेसमधील असलेले अंतर्गत साहित्य तुटणे, बसेसच्या इंजिनचा आवाज मोठा येणे, मध्येच पंक्चर होणे, इंजिन नादुरुस्त होणे या प्रकाराला प्रवासी कंटाळले आहेत. अनेकदा बसेस रस्त्यावर बंद पडली, तर दुरुस्त करता येत नसल्याने टोचन लावून न्यावे लागत आहे. यामुळे प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत.

बसच्या इंजिनातून हेलिकॅप्टरसारखा आवाज...

घणसोलीहून कोपर खैरणेकडे धावणाऱ्या बसेसच्या इंजिनामधून मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.


ठेकेदारांना सूचना दिल्या जातील- योगेश कडूस्कर, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम


बसेस सुस्थितीत कशा राहतील याकडे आमचे लक्ष आहे; परंतु जर बसेस नादुरुस्त होत असतील, तर चौकशी करून ठेकेदारांना सूचना दिल्या जातील.
योगेश कडूस्कर, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम
Comments
Add Comment

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा