नाशिकच्या केबीएच दंत महाविद्यालयात १७ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण

  86

नाशिक : ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संकट थोपवण्यासाठी राज्य सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करत असले तरी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. शाळा, महाविद्यालयातील वाढता संसर्ग प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. नगर, पुण्यानंतर आता नाशिकच्या पंचवटी येथील केबीएच दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील १७ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


नाशिक महापालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी ही माहिती दिली आहे. वसतिगृह व्यवस्थापनाने शनिवारी ५२ विद्यार्थिनींच्या स्वॅबचे नमुने घेतले होते. चाचणीत यातील १७ मुली पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यानंतर आज लगेचच महापालिकेच्या पथकाने जाऊन संबंधित वसतिगृहाची पाहणी केली. कोरोनाबाधित आढळलेल्या १७ विद्यार्थिनींना वसतिगृहातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.


गरज भासल्यास या सर्व विद्यार्थिनींना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी सांगितले. 'मुलांच्या वसतिगृहातही अशाच प्रकारे तपासणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांच्या अहवालाबाबत माहिती मिळालेली नाही. मुलांच्या चाचणीचे अहवाल आज येण्याची शक्यता आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांचा आकडा वाढत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या नाशिकमध्ये ६९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पैकी ग्रामीण भागांत २३२ रुग्ण आहेत तर महापालिकेच्या हद्दीत ४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात दहा रुग्ण आहेत तर जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांचा यात समावेश आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी