मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरमधील बावनदी पुलावर शनिवारी सकाळच्या सुमारास विचित्र अपघात घडला. तीन ट्रक आणि कार यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातातून एक ट्रकचालक बचावला. हा अपघात इतका भीषण होता की, पुलाचा कठडा तोडून ट्रकचा पुढचा भाग हवेत लोंबकळत होता. त्यात असलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तब्बल पाच तासांनंतर दुपारी एक वाजताच्या सुमारास वाहनांचा अडथळा दूर केल्यावर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.


या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून, एक जण जखमी झाला. मारुती जानू पाटील (वय ५५, रा. पाचुंबरे, ता. शिराळा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. अमोल जगदीश केसरकर (वय ३१, रा. मोरवे खंडाळा, जि. सातारा) यांनी संगमेश्वर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ते ट्रक, आणि जनार्दन जयवंत शेळके हे दुसरा ट्रक घेऊन निवळी ते साताऱ्याकडे जात होते. त्याचवेळी मारुती पाटील हा ट्रक घेऊन मुंबईहून भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने आला.


बावनदीच्या ब्रिटिशकालीन अरुंद पुलावर मध्यभागी ही वाहने आली असता, मारुती पाटील याचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रकची धडक प्रथम जनार्दन शेळके चालवत असलेल्या ट्रकला बसली. नंतर त्या पाठोपाठ येणार्‍या अमोल केसरकर याच्या ट्रकलाही धडकला. त्यामुळे केसरकर यांचा ट्रक मागे जाऊन तिरका फिरला. पुलाच्या मध्यभागी येऊन पुलाचा कठडा या ट्रकने तोडला. ट्रकचा पुढील भाग हा पुलाबाहेर लोंबकळत होता. सुदैवाने यातील चालक बचावला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. केसरकर यांच्या ट्रकच्या मागून येणाऱ्या कारलाही या ट्रकची धडक बसून नुकसान झाले. त्यामधील प्रवासी अर्शिया सोहेल मणेर (वय २६, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) ही जखमी झाली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात मारुती पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी