
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रिक्षा किंवा जीप गाडीने जावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसत आहे; परंतु याकडे सरकार लक्ष देईल का, अशी चर्चा सध्या विद्यार्थी वर्गात सुरू आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने हा तिढा अजून सुटला नाही, तर दुसरीकडे सरकार हा तिढा सोडविण्यासाठी पुढे येत नाही, तोवर एसटी कर्मचारीसुद्धा कामावर हजर होणार नाहीत, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. हा तिढा न सुटल्यास ग्रामीण भागांत चालणाऱ्या लालपरीचे काय होईल? अशी चिंता आता प्रवासी वर्गाला लागली आहे.