नाशिक प्रभाग रचनेचा आराखडा फुटला

Share

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा आराखडा फुटला असल्याची जोरदार चर्चा नाशिक शहरातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याबाबत मात्र महापालिका प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला असून त्यामुळे आराखडा फुटला की नाही, या विषयावर आता शहरांमध्ये चर्चा सुरू आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होण्याआधीच प्रभाग रचना फुटल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या धमाक्यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

निवडक प्रस्थापितांनी सोयीच्या भागात दौरे सुरू केल्यामुळे या चर्चेला बळकटी प्राप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सातपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दैतकार-पाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र देऊन न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, मनस, काँग्रेसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी कंबर कसली आहे. या पक्षांच्या नेत्यांचे शहरात दौऱ्यावर दौरे सुरू असताना आता महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा दावा होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

6 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

6 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

7 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

8 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

8 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

9 hours ago