युनायटेड प्रोड्युसर्स टॅलेंट कॉम्पिटिशनच्या कराराप्रमाणे राजेश खन्ना यांना औरत, डोली आणि इत्तेफाक यासारख्या सिनेमांमधून काम मिळालं...मात्र‘बहारों के सपने’ या सिनेमातून राजेश खन्ना हे नाव अधिक चर्चिलं गेलं...हा सिनेमा प्रेक्षकांना इतका आवडला की दुस-याच आठवड्यात या सिनेमाचा शेवट चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकांना दु:खाऐवजी हॅपी एंडने करावा लागला. यानंतर राजेश खन्ना झळकला तो आराधना सिनेमातून ...आणि एक नवा सुपरस्टार हिंदी सिनेमांना मिळाला....शक्ती सामंता यांचं दिग्दर्शन, रोमान्स आणि ट्रॅजेडी असा कथेतला मसाला, एकापेक्षा एक सरस गाणी आणि गाण्याइतकीची फ्रेश वाटली ती या गाण्यावर झळकलेली जोडी...राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर...
त्यानंतर कटी पतंग, दाग, अमर प्रेम, सच्चा झुठा, आन मिलो सजना यासारखे अनेक सुपरहिट फिल्मस दिले.
राजेश खन्ना यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे तो अभिनेत्री मुमताज यांचा....या दोघांची ऑन स्क्रीन केमेस्ट्री अफलातून हिट ठरली.....या दोघांनी एक नवा इतिहास हिंदी सिनेमांमध्ये रचला....दो रास्ते, बंधन, सच्चा झुटा, दुश्मन, हाथी मेरे साथी, बावर्ची, अपना देश, रोटी, आप की कसम, प्रेम कहानी यासारख्या हिट फिल्मस या दोघांनी दिल्या........
हृषीकेश मुखर्जी यांच्या आनंद सिनेमामध्ये राजेश खन्ना यांच्यामधल्या संवेदनशील अभिनेत्याचं एक वेगळंच आणि भारावून टाकणारं दर्शन घडलं