नाशिकमध्ये ३ मुलांचा बुडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मखमलाबाद येथे तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाटाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तिन्ही मुलांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या मखमलाबाद पेठ लिंक रोडवरील तुळजाभवानी नगर येथे ही घटना घडली. निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे अशी मुलांची नावे असून या तिघांचे वय अंदाजे १४ ते १५ वर्षे आहे. हे तिन्ही मित्र मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर ५ मित्रांसह पाटावर पोहोण्यासाठी गेले होते.

पाण्यात उतरल्यानंतर सर्वजण आनंद लुटत होते. पण पाण्यात पुढे गेल्यावर त्यांना पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या पाच जणांमधील तिघेजण पाण्यात बुडू लागले. आपले मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून दोघांनी आरडाओरडा केला आणि घाबरलेल्या या मुलांनी नंतर या ठिकाणाहून पळ काढला. नंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिघेजण पाण्यात बुडाल्याचे आढळले. त्यांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली.

त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तिघांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र दुर्दैवाने या तिघाही मुलांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
Comments
Add Comment

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यांच्या

ट्रेनच्या AC कोचमध्ये प्रवाशांसाठी नवी सुविधा, मळक्या ब्लँकेट्सचा त्रास संपला.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या स्वछता आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या बेडरोलमध्ये

ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल