मुलांच्या लग्नाचे वयही वाढवावे

  65

 शशिकांत रा. सावंत,


मुंबई : मुलींच्या लग्नासाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकारचा निर्णय योग्य असून स्वागतार्ह आहे. बालविवाह प्रतिबंध दुरुस्ती विधेयक २०२१ लोकसभेत सादर केले होते. यामध्ये महिलांसाठी कायदेशीर किमान वय २१ वर्षे करण्याची तरतूद आहे. विश्वासात न घेतल्यामुळे विधेयक मांडण्यास काही विरोधीपक्षांनी विरोध व निषेध व्यक्त केला. संबंधित पक्षांनी सल्लामसलत करण्यात आला नसल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. हे विधेयक मंजूर झाल्याने महिलांचे कायदेशीर वय पुरुषांच्या बरोबरीचे होणार आहे. हे विधेयक पुढील चर्चा आणि तपासणीसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आले आहे.


केंद्र सरकारने विधेयक सादर करताना वाढती लोकसंख्या, मुलींचे शिक्षण, करियर, आरोग्य याचा विचार करता घेतलेला निर्णय योग्य व स्वागतार्ह आहे. मुलींचे लग्नाचे सरासरी वय २२ इतके झाले आहे. शहरात मुलींना शिकवण्यावर, आत्मनिर्भर बनविण्यावर भर दिला जातो. मुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती २१ वर्षांची होते. २३ ते २८ वर्षे हे आई होण्याचे योग्य आहे, तसे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. म्हणजेच मुलींच्या शिक्षण आणि आरोग्याचा विचार करता हा शासन निर्णय योग्य असून स्वागतार्ह आहे. वास्तविक पाहता मुलांच्या लग्नाचे वयही २१वर्षांवरून २४ वर्षे करावे ही काळाची गरज आहे.


Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर