दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कडक

मुंबई: मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम अधिक कडक केले आहेत.


सध्या मुंबईत ओमायक्रॉन आणि कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यातच ३१ डिसेंबरला मुंबईत गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून पालिका खबरदरी घेत असली तरी सध्याचे वाढते कोरोना रुग्णांचे आकडे भीतीदायक आहेत. यासाठी महापालिकेने परदेशातून आणि मुख्यतः दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
ओमायक्रॉनचा पार्श्वभूमीवर अति जोखीम असलेल्या १२ देशांची नावे भारत सरकारच्या यादीत आहेत. त्यापैकी दुबई हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अनेक उड्डाणे येथून बदलली जातात. त्यामुळे दुबईहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडे विशेष लक्ष दिले जाणार असून कडक नियम पालिकेने जाहीर केले आहे.




काय आहेत नवीन नियम?



• दुबईहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांनी ७ दिवस होम क्वारंटाईन राहायचे आहे. मुंबई विमानतळावर उतरणारे मुंबई ऐवजी राज्यातील अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी त्यांच्या घरी जाण्यासाठी जिल्हाधिकारी प्रवासाची सोय करतील. त्यांना सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करण्यास मनाई असेल. दुबईहून येणाऱ्या प्रवाशांबाबत ज्या प्रवाशांची मुंबई विमानतळावरून इतर राज्यात अथवा महाराष्ट्रात इतर विमानतळावर जोडून फ्लाईट असल्यास विमानतळ अधिकाऱ्याला कळविण्याची जबाबदारी विमानतळ प्राधिकरणाची असेल. दुबईहून मुंबईला आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील रहिवासी असल्यास ७ दिवस पालिकेच्या वॉर्ड रूम नियमाप्रमाणे होम क्वारांटाईन राहावे लागणार आहे व सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. जर चाचणी निगेटीव्ह आल्यास पुढील ७ दिवस प्रवाशाने स्वतःचे निरीक्षण करायचे आहे. चाचणी पॉझिटीव्ह आल्यास आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्गदर्शक सूचनेनुसार क्वारंटाईन केले जाईल.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :