एसटीचा संप कागदावरच मिटला, पालघर जिल्ह्यातील एसटीचे चाक रुतलेलेच

पालघर (वार्ताहर) :एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेला एसटीचा संप मिटला, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबईत केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात ४०१ एसटी बस अद्याप आगारातच उभ्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरात लवकर मिटावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.



परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची बैठक होऊन संघटनेचे नेते अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले तरी काही कामगार संघटना अद्याप नाराज असल्याचे समोर आले आहे.



एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम असल्याने अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. २२ डिसेंबर ला याबाबत मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांनी सांगितले की हा संप नसुन दुखवटा आहे आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने याबाबत पुढील तारीख ५ जानेवारी दिली असून कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. कर्मचारी मात्र मागणीवर ठाम आहेत.





९१ जणांची सेवा समाप्त करणार


पालघर जिल्ह्यातील आठ आगारातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. सरकारने पगारवाढ दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले. अनेक कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत. अशा ९१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाण्याची शक्यता आहे.





४५ दिवसांत २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान


पालघर जिल्ह्यात एसटीच्या संपामुळे सर्वसामान्याची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. यामुळे पालघर एसटी विभागाचे तब्बल २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.



कर्मचाऱ्यांना हवे विलीनीकरण


सरकारने दिलेल्या पगारवाढीनंतर सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना विलीनीकरणच हवे आहे. अद्याप बहुसंख्य कामगार विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी सरकारने दिलेली पगारवाढ नाकारली आहे.


Comments
Add Comment

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत

BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे

उंदीर फळे खातात म्हणून फळविक्रेत्याने फळांना चक्क 'रॅट किलर' औषध लावलं; दोघांना अटक

मुंबई: मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ घेत असाल तर सावधान! कारण मालाड परिसरात फळ विक्रेताचा एक अतिशय धक्कादायक

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४