एसटीचा संप कागदावरच मिटला, पालघर जिल्ह्यातील एसटीचे चाक रुतलेलेच

  152

पालघर (वार्ताहर) :एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेला एसटीचा संप मिटला, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबईत केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात ४०१ एसटी बस अद्याप आगारातच उभ्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरात लवकर मिटावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.



परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची बैठक होऊन संघटनेचे नेते अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले तरी काही कामगार संघटना अद्याप नाराज असल्याचे समोर आले आहे.



एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम असल्याने अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. २२ डिसेंबर ला याबाबत मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांनी सांगितले की हा संप नसुन दुखवटा आहे आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने याबाबत पुढील तारीख ५ जानेवारी दिली असून कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. कर्मचारी मात्र मागणीवर ठाम आहेत.





९१ जणांची सेवा समाप्त करणार


पालघर जिल्ह्यातील आठ आगारातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. सरकारने पगारवाढ दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले. अनेक कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत. अशा ९१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाण्याची शक्यता आहे.





४५ दिवसांत २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान


पालघर जिल्ह्यात एसटीच्या संपामुळे सर्वसामान्याची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. यामुळे पालघर एसटी विभागाचे तब्बल २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.



कर्मचाऱ्यांना हवे विलीनीकरण


सरकारने दिलेल्या पगारवाढीनंतर सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना विलीनीकरणच हवे आहे. अद्याप बहुसंख्य कामगार विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी सरकारने दिलेली पगारवाढ नाकारली आहे.


Comments
Add Comment

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना