एसटीचा संप कागदावरच मिटला, पालघर जिल्ह्यातील एसटीचे चाक रुतलेलेच

पालघर (वार्ताहर) :एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेला एसटीचा संप मिटला, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबईत केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात ४०१ एसटी बस अद्याप आगारातच उभ्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरात लवकर मिटावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.



परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची बैठक होऊन संघटनेचे नेते अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले तरी काही कामगार संघटना अद्याप नाराज असल्याचे समोर आले आहे.



एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम असल्याने अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. २२ डिसेंबर ला याबाबत मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांनी सांगितले की हा संप नसुन दुखवटा आहे आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने याबाबत पुढील तारीख ५ जानेवारी दिली असून कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. कर्मचारी मात्र मागणीवर ठाम आहेत.





९१ जणांची सेवा समाप्त करणार


पालघर जिल्ह्यातील आठ आगारातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. सरकारने पगारवाढ दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले. अनेक कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत. अशा ९१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाण्याची शक्यता आहे.





४५ दिवसांत २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान


पालघर जिल्ह्यात एसटीच्या संपामुळे सर्वसामान्याची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. यामुळे पालघर एसटी विभागाचे तब्बल २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.



कर्मचाऱ्यांना हवे विलीनीकरण


सरकारने दिलेल्या पगारवाढीनंतर सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना विलीनीकरणच हवे आहे. अद्याप बहुसंख्य कामगार विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी सरकारने दिलेली पगारवाढ नाकारली आहे.


Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१