मुंबई : कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करणारी बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या कपड्यांबद्दल नेहमीच चर्चेत असते. फॅन्स सुद्धा तिच्या बोल्ड लूकवर दररोज कमेंटचा वर्षाव करत असतात.
बिग बॉस स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद ही सोशल मीडियावरून खूपच ऍक्टिव्ह राहिली आहे. उर्फी नेहमीच तिच्या इंस्टाग्रामवर बोल्ड फोट शेअर करत असते. यावर तिला सोशल मीडिया युजर्सकडून कधी चांगल्या कॉमेंट्स वर्षाव होत असतो तर कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
या ट्रोलिंग बाबत सांगतांना ती म्हणाली आहे की,’ ‘मी मुस्लिम मुलगी आहे. पण माझ्या प्रत्येक पोस्टवर घाणेरड्या कमेंट्स करणारे सर्वाधिक मुस्लिमच असतात. मी इस्लामची प्रतिमा मलिन करतेय, असे त्यांना वाटते. ते माझा तिरस्कार करतात. कारण आपल्या महिलांनी एका विशिष्ट पद्धतीनेच वागावे, असे मुस्लिम पुरूषांना वाटते.
ते सर्व महिलांना नियंत्रित करू इच्छितात. हेच कारण आहे की मी इस्लाम मानत नाही. मी त्यांच्या म्हणण्यानुसार वागत नाही, म्हणून ते मला ट्रोल करतात, माझा राग करतात. त्यामुळे मी कधीही मुस्लिम पुरूषाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम वा अन्य कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे मी कोणाच्याही प्रेमात पडू शकते. मला आवडेल, त्या व्यक्तिशी मी लग्न करेल.’
उर्फीच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ‘सात फेरी की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी’ सारख्या टीव्ही शोमध्ये ती टीव्हीवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली आहे.
उर्फीने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले, तरी बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर उर्फी अधिक लोकप्रिय झाली.
या शोमधला तिचा प्रवास खूपच छोटा होता, पण शोमुळे तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत गेली आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…