चीनी मोबाईल कंपन्यांवर इन्कमटॅक्सचे धाडसत्र

नवी दिल्ली (हिं.स.) : करचुकवेगिरीत सहभागी असलेल्या चिनी मोबाईल कंपन्यांवर आज, बुधवारी आयकर विभागाने धाडी टाकल्या. राज्यातील मुंबईसह दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि दक्षिण भारतातील बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये सकाळी ९ वाजता एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात झाली. चीनी मोबाईल कंपनी Oppo आणि Mi च्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे.


आयकर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनी मोबाईल कंपनी एमआय आणि ओप्पो आणि इतर अनेक कंपन्यांसह वरिष्ठ अधिकारी, संचालक आणि सीएफओ यांच्यावर छापे टाकण्यात आले आहेत. या चिनी कंपन्यांच्या अनेक उत्पादन युनिट्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि गोदामांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या वर्षी ऑगस्टमध्ये गुरुग्राममध्ये चीनी उपकरणे बनवणाऱ्या जेटीईवर आयकर छापा पडला होता. कंपनीच्या भारत प्रमुखाचीही इन्कम टॅक्स विभागाने चौकशी केली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी चौकशीत या कंपन्यांनी विविध प्रकारच्या करांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. मोबाईल फोन, कर्ज अर्ज आणि वाहतूक व्यवसायात गुंतलेल्या अनेक चिनी कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी अलीकडेच छापे टाकले होते. त्यानंतर आज देशभरात पडलेले छापे म्हणजे मोठी कारवाई असल्याचे मत उद्योग जगतातील जाणकारांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.