चीनी मोबाईल कंपन्यांवर इन्कमटॅक्सचे धाडसत्र

  81

नवी दिल्ली (हिं.स.) : करचुकवेगिरीत सहभागी असलेल्या चिनी मोबाईल कंपन्यांवर आज, बुधवारी आयकर विभागाने धाडी टाकल्या. राज्यातील मुंबईसह दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि दक्षिण भारतातील बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये सकाळी ९ वाजता एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात झाली. चीनी मोबाईल कंपनी Oppo आणि Mi च्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे.


आयकर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनी मोबाईल कंपनी एमआय आणि ओप्पो आणि इतर अनेक कंपन्यांसह वरिष्ठ अधिकारी, संचालक आणि सीएफओ यांच्यावर छापे टाकण्यात आले आहेत. या चिनी कंपन्यांच्या अनेक उत्पादन युनिट्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि गोदामांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या वर्षी ऑगस्टमध्ये गुरुग्राममध्ये चीनी उपकरणे बनवणाऱ्या जेटीईवर आयकर छापा पडला होता. कंपनीच्या भारत प्रमुखाचीही इन्कम टॅक्स विभागाने चौकशी केली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी चौकशीत या कंपन्यांनी विविध प्रकारच्या करांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. मोबाईल फोन, कर्ज अर्ज आणि वाहतूक व्यवसायात गुंतलेल्या अनेक चिनी कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी अलीकडेच छापे टाकले होते. त्यानंतर आज देशभरात पडलेले छापे म्हणजे मोठी कारवाई असल्याचे मत उद्योग जगतातील जाणकारांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.