परमबीर सिंग यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात

  79

मुंबई (प्रतिनिधी): कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारनं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सेवेतून निलंबित केलं आहे. दरम्यान, सेवेतून निलंबित केलेल्या परमबीर सिंग यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. सिंग यांच्याविरोधात अखिल भारतीय सेवा नियम अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिवाय आणखी २८ अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलिस महासंचालकांनी केली आहे.

हिवाळी अधिवेशात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. मुंबई पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी यांनी विधानसभेत लेखी विचारलेल्या प्रश्नाला गृहमंत्री वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. परमबीर सिंग यांच्यासह ३० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

या गुन्ह्यांच्या निपक्षपतीपणे तपास करण्यासाठी त्यांना सेवेत ठेवणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांनी सरकारला दिला आहे. यामध्ये पाच पोलिस उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्त दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे. याबाबत काय अनियमितता झाली याचा तपशील अहवाल गृह खात्याने मागवला असून अहवालानुसार परमवीर सिंग आणि पराग मणेरे यांचे निलंबन करण्यात आल्याची गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे.
Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता