मुंबई (प्रतिनिधी): कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारनं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सेवेतून निलंबित केलं आहे. दरम्यान, सेवेतून निलंबित केलेल्या परमबीर सिंग यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. सिंग यांच्याविरोधात अखिल भारतीय सेवा नियम अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिवाय आणखी २८ अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलिस महासंचालकांनी केली आहे.
हिवाळी अधिवेशात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. मुंबई पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी यांनी विधानसभेत लेखी विचारलेल्या प्रश्नाला गृहमंत्री वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. परमबीर सिंग यांच्यासह ३० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या गुन्ह्यांच्या निपक्षपतीपणे तपास करण्यासाठी त्यांना सेवेत ठेवणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांनी सरकारला दिला आहे. यामध्ये पाच पोलिस उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्त दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे. याबाबत काय अनियमितता झाली याचा तपशील अहवाल गृह खात्याने मागवला असून अहवालानुसार परमवीर सिंग आणि पराग मणेरे यांचे निलंबन करण्यात आल्याची गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…