त्र्यंबकेश्वर मंदिरच्या गर्भगृह प्रवेश बंदी मागे घेण्याची मागणी

  135

त्र्यंबकेश्वर :प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृह प्रवेशासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ येऊ देऊ नये, असे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मंदिरातील गर्भगृहात जाण्यास श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मनाई केलेली आहे.

ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी हरीगिरीजी महाराज यांनी केली आहे. कोविड काळ आणि प्राचीन पिंडीचे रक्षण व्हावे या हेतूने पिंडीजवळ जाण्यास श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने सध्या मनाई केली आहे. सोवळे नेसून पिंडीजवळ जाण्याची पद्धत आहे. पुरोहितांबरोबरच साधूंनाही सध्या गर्भगृहात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. याबाबत स्थानिक साधू महंत यांच्यावतीने देवस्थान ट्रस्टला पत्र देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर ते सौराष्ट्र सोमनाथ ही ज्योतिर्लिंगांची दोन ठिकाणे रेल्वेने जोडावीत अशी मागणी आखाडा परिषदेच्यावतीने केली आहे. महामंडलेश्वर नगर पिंपळद येथे भेट दिल्यानंतर नील पर्वतावर ते बोलत होते. आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापुर्वी त्र्यंबकेश्वर रेल्वेने जोडावे अशी मागणी वाढत आहे.
Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी