जपानने रोखले भारताला

ढाका (वृत्तसंस्था) :आशियाई चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न भंगले. तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्धी जपानने खेळ उंचावताना गतविजेत्यांवर ५-३ असा विजय मिळवत आठ वर्षांनंतर फायनल प्रवेश केला. अंतिम फेरीत जपानसमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असेल.



गटवार साखळीत जपानचा ६-० असा धुव्वा उडवणाऱ्या भारताचे उपांत्य फेरीत पारडे जड होते. मात्र, दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानने कमाल केली. त्यांनी पाच गोल करताना मागील पराभवाचा सव्याज बदला घेतला. तसेच दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी, जपानने २०१३मध्ये फायनल प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना पाकिस्तानकडून मात खावी लागली होती.



पहिल्या सत्रात चार तर दुसऱ्या सत्रात तीन गोल झाले. जपानकडून क्रिशिडाने पहिल्या आणि २९व्या मिनिटाला दोन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला, फुजिशिमा (दुसऱ्या मिनिटाला) मोरॅटा (३५व्या मिनिटाला) आणि टॅनाकाची (४१व्या मिनिटाला) चांगली साथ लाभली. भारताकडून दिलप्रीत(१७व्या मिनिटाला), हरमनप्रीत (५३व्या मिनिटाला) आणि हार्दिकने (५९व्या मिनिटाला) गोल केला.
जपानने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्या सहा मिनिटांत सहा पेनल्टी कॉर्नरवर मिळवले.  तसेच त्यातील दोन कॉर्नरचे गोलांमध्ये रूपांतर करताना २-० अशी आघाडी घेतली. भारताने आक्रमक चाली रचण्याचा प्रयत्न केला तरी पहिल्या क्वार्टरअखेर जपानने आघाडी कायम राखली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दुसऱ्याच मिनिटाला (१७वे मिनिट) भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत प्रतिस्पर्ध्यांची आघाडी कमी केली. दिलप्रीतने हा गोल केला. या गोलनंतर गतविजेत्यांचा आत्मविश्वास उंचावला.


या क्वार्टरमध्ये भारताने अधिकाधिक वेळ चेंडूचा ताबा राखला. परंतु, एक मिनिट आधी मैदानावरील अंपायर्सनी जपानला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. त्यात गोल करताना त्यांनी एकूण आघाडी ३-१ अशी वाढवली.तिसऱ्या क्रमांकासाठी भारत पाकिस्तानशी भिडणार उपांत्य फेरीतील भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी तिसऱ्या क्रमांकासाठी एकमेकांशी भिडतील.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे