हे दारू विकणाऱ्यांचे सरकार

Share

भंडारा (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘हे दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे’, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी मविआ सरकारवर केला आहे. तसेच, ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पापही याच सरकारने केले, असा आरोपही त्यांनी आघाडी सरकारवर केला. फडणवीस यांनी भंडारा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यानच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

फडणवीस म्हणाले की, ‘कोरोना काळात ह्या सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केलेली नाही. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले. हे सरकार एवढ्यावर न थांबता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारूवरील ५० टक्के कर कमी करण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे’, असा आरोप फडणवीसांनी केला.

त्यांनी गोंदियाच्या सभेप्रमाणे बोनसबाबत सरकारची खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोलेंवरही निशाणा साधला. हे ‘रोज संविधान खतरे में’, असे म्हणतात. धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना नाना त्याबाबत बोलत नाहीत’, अशा परखड शब्दांत त्यांनी नानांना सुनावले.

फडणवीसांनी सरकारवर आरोप केला आहे की, ‘ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप ह्या सरकारने केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने वेळेत मागितलेली माहिती वेळेत तयार न केल्याने राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे ताशेरे ओढत हे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

56 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago