हे दारू विकणाऱ्यांचे सरकार

भंडारा (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘हे दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे’, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी मविआ सरकारवर केला आहे. तसेच, ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पापही याच सरकारने केले, असा आरोपही त्यांनी आघाडी सरकारवर केला. फडणवीस यांनी भंडारा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यानच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.


फडणवीस म्हणाले की, ‘कोरोना काळात ह्या सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केलेली नाही. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले. हे सरकार एवढ्यावर न थांबता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारूवरील ५० टक्के कर कमी करण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे’, असा आरोप फडणवीसांनी केला.


त्यांनी गोंदियाच्या सभेप्रमाणे बोनसबाबत सरकारची खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोलेंवरही निशाणा साधला. हे ‘रोज संविधान खतरे में’, असे म्हणतात. धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना नाना त्याबाबत बोलत नाहीत’, अशा परखड शब्दांत त्यांनी नानांना सुनावले.


फडणवीसांनी सरकारवर आरोप केला आहे की, ‘ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप ह्या सरकारने केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने वेळेत मागितलेली माहिती वेळेत तयार न केल्याने राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे ताशेरे ओढत हे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून