हे दारू विकणाऱ्यांचे सरकार

  65

भंडारा (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘हे दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे’, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी मविआ सरकारवर केला आहे. तसेच, ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पापही याच सरकारने केले, असा आरोपही त्यांनी आघाडी सरकारवर केला. फडणवीस यांनी भंडारा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यानच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.


फडणवीस म्हणाले की, ‘कोरोना काळात ह्या सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केलेली नाही. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले. हे सरकार एवढ्यावर न थांबता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारूवरील ५० टक्के कर कमी करण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे’, असा आरोप फडणवीसांनी केला.


त्यांनी गोंदियाच्या सभेप्रमाणे बोनसबाबत सरकारची खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोलेंवरही निशाणा साधला. हे ‘रोज संविधान खतरे में’, असे म्हणतात. धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना नाना त्याबाबत बोलत नाहीत’, अशा परखड शब्दांत त्यांनी नानांना सुनावले.


फडणवीसांनी सरकारवर आरोप केला आहे की, ‘ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप ह्या सरकारने केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने वेळेत मागितलेली माहिती वेळेत तयार न केल्याने राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे ताशेरे ओढत हे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पंढरपूर : शासकीय महापूजेच्या निमित्ताने पंढपूरमध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.