मुंबई : २०० कोटींच्या कथित मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) यांनी ईडीसमोर (ED) अनेक खुलासे केले आहेत. सुकेश चंद्रशेखर यांनी सांगितले की, ते शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि श्रद्धा कपूरसह (Shraddha Kapoor) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood celebrities) संपर्कात होते. त्यानंतर ईडी आता सर्व सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलवत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेश चंद्रशेकर यांनी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरबद्दल सांगितले की, ते श्रद्धाला २०१५ पासून ओळखतात. इतकंच नाही तर गेल्या वर्षी ड्रग्ज (drugs) प्रकरणादरम्यान त्याने श्रद्धा कपूरला मदत केली होती. ड्रग्ज प्रकरणी श्रद्धा कपूरला गेल्या वर्षी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. श्रद्धा कपूरसोबत सारा अली खान (Sara Ali Khan), रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनाही एनसीबीसमोर हजर व्हावे लागले. त्याचबरोबर, पतीच्या सुटकेसाठी शिल्पा शेट्टीने देखील सुकेशशी संपर्क साधला होता.
श्रद्धा कपूरशिवाय सुकेश चंद्रशेखरने चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीचेही नाव घेतले आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी सांगितले की, अलीकडेच शिल्पा शेट्टीने पोर्नोग्राफी (pornography) प्रकरणी तुरुंगात असलेले पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) सशर्त सुटकेसाठी तिने माझ्याशी संपर्क साधला होता.
त्याचबरोबर सुकेश चंद्रशेखरने सांगितले की, तो हरमन बावेजालाही (Harman Baweja) ओळखत होता. हरमन बावेजासोबत तो कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) अभिनीत कॅप्टन (Captain) चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत होता. सुकेश चंद्रशेखरच्या या खुलाशानंतर आता ईडी या सर्व सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ईडीने जॅकलिन फर्नांडिस (Jacquline Fernandes) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांचीही चौकशी केली आहे.
सुकेश चंद्रशेखर हा प्रसिद्ध ठग आहे. त्याच्यावर देशभरात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग (Shivinder Singh) आणि मलविंदर सिंग (Malvinder Singh) यांची दोनशे कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखर, त्यांची पत्नी मारिया पॉल (Maria Paul) यांच्यासह अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्यावर एआयडीएमचे नेते दिनाकरण यांच्याकडून निवडणूक चिन्ह मिळवण्याच्या नावाखाली २ कोटी रुपये उकळल्याचा आरोप देखील आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…