पदोन्नती, सफाई कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरी

  182

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या हिताचे अनेक कल्याणकारी निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतले आहेत. यामध्ये विशेषत्वाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी प्रशासन विभागास निर्देश दिले आहेत.



महानगरपालिकेतील आठ सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार या पदावर नियुक्ती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मागील सात वर्षांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न यामुळे निकाली निघाला असून आम्हाला न्याय मिळाला अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.



अशाच प्रकारे मागील सुमारे २० वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असणारे विविध संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नती न झाल्यामुळे लाभापासून वंचित होते. याचा विचार करून आयुक्तांनी सहाय्यक प्लंबर - मदतनीस पदावरून आठ कर्मचाऱ्यांना प्लंबर - फिटर पदावर पदोन्न्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ड्रेसरपदावरून तीन कर्मचाऱ्यांची शस्त्रक्रिया गृहसहाय्यक या पदावर पदोन्नती दिलेली आहे.
त्याचप्रमाणे १०८ लिपिक-टंकलेखक, ९ रेकॉर्ड असिस्टंट, २ रक्तसंक्रमण अधिकारी अशा एकूण ११९ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे





Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही