पदोन्नती, सफाई कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरी

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या हिताचे अनेक कल्याणकारी निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतले आहेत. यामध्ये विशेषत्वाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी प्रशासन विभागास निर्देश दिले आहेत.



महानगरपालिकेतील आठ सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार या पदावर नियुक्ती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मागील सात वर्षांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न यामुळे निकाली निघाला असून आम्हाला न्याय मिळाला अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.



अशाच प्रकारे मागील सुमारे २० वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असणारे विविध संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नती न झाल्यामुळे लाभापासून वंचित होते. याचा विचार करून आयुक्तांनी सहाय्यक प्लंबर - मदतनीस पदावरून आठ कर्मचाऱ्यांना प्लंबर - फिटर पदावर पदोन्न्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ड्रेसरपदावरून तीन कर्मचाऱ्यांची शस्त्रक्रिया गृहसहाय्यक या पदावर पदोन्नती दिलेली आहे.
त्याचप्रमाणे १०८ लिपिक-टंकलेखक, ९ रेकॉर्ड असिस्टंट, २ रक्तसंक्रमण अधिकारी अशा एकूण ११९ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे





Comments
Add Comment

एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच बैठकीत बांग्लादेशी विरोधात ऍक्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईमध्ये बोगस

मुंबईत आता फेरीवाल्यांची झाडाझडती

महापौरांच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांचे ओळखपत्रे आणि कागदपत्रे तपासणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे सभागृह उबाठाच्या काळात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिराने

महाराष्ट्रातून थंडी जाणार पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, कसं असेल हवामान ?

मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची

कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे

मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘हाय-टेक’ कॅप्टन; प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणेसाठी प्रयत्न

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश