वनडे मालिकेत खेळणार, विराट कोहलीचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी उपलब्ध होतो आणि आहे. तुम्ही हा प्रश्न विचारायलाच नको, असे स्पष्टीकरण भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दिले आहे. मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहेच. तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारायला हवेत, जे यासंदर्भात चुकीच्या गोष्टी लिहीत आहेत. माझं म्हणाल तर मी सिलेक्शनसाठी उपलब्ध आहे. मी नेहमीच खेळण्यासाठी इच्छुक असतो, असे कोहली म्हणाला.....

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर विराट कोहली या प्रकारातील संघाच्या कर्णधारपदावरून स्वत:हून पायउतार झाला. त्यावेळी त्याला वनडे कर्णधारपदही सोडावे लागेल, अशी चर्चा सुरू झाली होती. तसेच घडलेही. न्यूझीलंड दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करताना बीसीसीआयने वनडे संघाचे कर्णधारपद देखील रोहित शर्माकडे दिले. त्यामुळे विराट कोहली दुखावल्याची चर्चा सुरू झाली.....

त्यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेमधून वैयक्तिक कारणासाठी विराट कोहलीने बीसीआयकडे विचारणा केल्याचे प्रसिद्ध झाले. रोहित शर्मासोबत वाद असल्यामुळेच विराट कोहलीनं एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्याचे देखील बोलले जात होतं. त्यासंदर्भात अखेर विराट कोहलीने मौन सोडले.....

खेळापेक्षा कुणी मोठा नाही : अनुराग ठाकूर

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादावर भाष्य करताना, खेळापेक्षा कोणी मोठं नाही असे सांगताना केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी संबंधित फेडरेशन, संस्थांनी यासंबंधी अधिक माहिती दिली पाहिजे असे म्हटले आहे.

खेळ सर्वोच्च असून कोणीही खेळापेक्षा मोठं नाही. कोणत्या खेळात कोणत्या खेळाडूंमध्ये काय सुरु आहे ही माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. हे काम त्या संबंधित फेडरेशन, संस्थांचं आहे. त्यांनीच माहिती दिली तर हे बरं होईल, असं अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वीच भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद कोहलीकडून काढून मुंबईकर रोहितकडे सोपवण्यात आले.
Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू