Thursday, May 15, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

ठाण्यात भटक्या कुत्र्याची दहशत

ठाणे (वार्ताहर) : ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. ठाण्यातील सावरकर नगर, म्हाडा आणि पाटीलवाडी भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी सुमारे १५ जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे.
यामध्ये ३ ते ४ लहान मुलांचा देखील समावेश आहे. या कुत्र्याला पकडण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी पाचरण करण्यात आली, दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध सुरू होता. अखेर संध्याकाळी उशिरा हा कुत्र्याला पकडण्यात ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला यश आले.



दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यात आता सावरकर नगर भागात सोमवारी सकाळी ११.३० वाजता पासून एका पिसळलेल्या कुत्र्याने येथील नागरिकांना भयभीत करून सोडल्याचे दिसून आले. या पिसाळलेल्या कुत्र्याने कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला चावा घेऊन पळ काढला. यात तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. या भागातील सुमारे ३४ जणांना त्यांनी चावा घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या कुत्र्याला अखेर सांयकाळी उशिरा या कुत्र्याला पकडण्यात यश आले. दरम्यान तब्बल ३४ जणांना चावा घेतल्यामुळे भटक्या कुर्त्यांची दहशद पुन्हा एकदा ठाणेकरांमध्ये पसरली आहे.

Comments
Add Comment