आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपर फूटी प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई

पुणे : आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेत झालेले गोंधळ, त्यानंतर प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता आरोग्य विभागाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) करावी, अशी मागणी होत असली, तरी ते अशक्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. एमपीएससीमार्फत पदभरती केल्यास त्या प्रक्रियेला विलंब लागेल, असा दावाही पवार यांनी केला. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फूटी प्रकरणात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर करोना आढावा बैठकीसाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी त्याबाबत माहिती दिली.

शासनाने निर्णय घेतल्यानंतर प्रत्येकाने पारदर्शकपणे काम केले पाहिजे. मात्र, परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्याने दुर्दैवाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गाची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलावी लागली. परीक्षा घेण्याबाबत व्यवस्थेचे संगणकीकरण होऊनही असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपर फूट प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करू. एवढी कडक कारवाई करू, की यापुढील काळात असे प्रकार होणार नाहीत, अशी ग्वाही पवार यांनी या वेळी दिली.

आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत घेणे अवघड आहे. कारण असा निर्णय घेतल्यास परीक्षा घेण्यास विलंब लागेल. एमपीएससीकडे हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आणि उमेदवारांची निवड करणे प्रलंबित आहे.
Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह