मध्य रेल्वे कर्मचा-यांच्या समन्वयाने आरपीएफने पळून गेलेल्या ८६४ मुलांचा लावला शोध

मुंबई : रेल्वे संरक्षण दल (RPF) ने टीटीई, जीआरपी, मध्य रेल्वेचे स्टेशन कर्मचारी यांच्या समन्वयाने जानेवारी ते नोव्हेंबर- २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेवरील ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे परिसरातून पळून आलेल्या ८६४ मुलांची सुटका केली आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबासोबत जोडले.

यामध्ये ५३५ मुले आणि ३२९ मुलींचा समावेश आहे जे एकतर घरातून पळून गेले होते किंवा हरवले होते आणि आरपीएफने तिकीट तपासणी कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस, चाइल्डलाइन एनजीओ आणि प्रवाशांच्या मदतीने ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या आवारात सापडले होते.

यातील बहुतेक मुले काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर आली होती. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

मध्य रेल्वेवर जानेवारी ते नोव्हेंबर- २०२१ पर्यंत सुटका केलेल्या (शोधलेल्या) मुलांचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे :

मुंबई विभाग ३२२ मुले (१९४ मुले आणि १२८ मुली)

पुणे विभाग ३०६ मुले (२१२ मुले व ९४ मुली)



भुसावळ विभाग १२८ मुले (७७ मुले व ५१ मुली).

नागपूर विभाग ६६ मुले (२८ मुले व ३८ मुली).

सोलापूर विभाग ४२ मुले (२४ मुले व १८ मुली).

मध्य रेल्वेवर नोव्हेंबर-२०२१ महिन्यात ५० मुले आणि २९ मुलींसह एकूण ७९ मुलांची सुटका करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र करण्यात आले.

मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आणि अशा प्रकरणांची माहिती कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचार्यांना किंवा जवळच्या चाइल्डलाइन एनजीओकडे किंवा हेल्पलाइन नंबर 1098 वर डायल करा आणि त्याद्वारे हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्यास मदत करण्याचे आवाहन करीत आहे.


Comments
Add Comment

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८