मध्य रेल्वे कर्मचा-यांच्या समन्वयाने आरपीएफने पळून गेलेल्या ८६४ मुलांचा लावला शोध

मुंबई : रेल्वे संरक्षण दल (RPF) ने टीटीई, जीआरपी, मध्य रेल्वेचे स्टेशन कर्मचारी यांच्या समन्वयाने जानेवारी ते नोव्हेंबर- २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेवरील ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे परिसरातून पळून आलेल्या ८६४ मुलांची सुटका केली आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबासोबत जोडले.

यामध्ये ५३५ मुले आणि ३२९ मुलींचा समावेश आहे जे एकतर घरातून पळून गेले होते किंवा हरवले होते आणि आरपीएफने तिकीट तपासणी कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस, चाइल्डलाइन एनजीओ आणि प्रवाशांच्या मदतीने ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या आवारात सापडले होते.

यातील बहुतेक मुले काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर आली होती. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

मध्य रेल्वेवर जानेवारी ते नोव्हेंबर- २०२१ पर्यंत सुटका केलेल्या (शोधलेल्या) मुलांचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे :

मुंबई विभाग ३२२ मुले (१९४ मुले आणि १२८ मुली)

पुणे विभाग ३०६ मुले (२१२ मुले व ९४ मुली)



भुसावळ विभाग १२८ मुले (७७ मुले व ५१ मुली).

नागपूर विभाग ६६ मुले (२८ मुले व ३८ मुली).

सोलापूर विभाग ४२ मुले (२४ मुले व १८ मुली).

मध्य रेल्वेवर नोव्हेंबर-२०२१ महिन्यात ५० मुले आणि २९ मुलींसह एकूण ७९ मुलांची सुटका करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र करण्यात आले.

मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आणि अशा प्रकरणांची माहिती कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचार्यांना किंवा जवळच्या चाइल्डलाइन एनजीओकडे किंवा हेल्पलाइन नंबर 1098 वर डायल करा आणि त्याद्वारे हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्यास मदत करण्याचे आवाहन करीत आहे.


Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे