मध्य रेल्वे कर्मचा-यांच्या समन्वयाने आरपीएफने पळून गेलेल्या ८६४ मुलांचा लावला शोध

  41

मुंबई : रेल्वे संरक्षण दल (RPF) ने टीटीई, जीआरपी, मध्य रेल्वेचे स्टेशन कर्मचारी यांच्या समन्वयाने जानेवारी ते नोव्हेंबर- २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेवरील ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे परिसरातून पळून आलेल्या ८६४ मुलांची सुटका केली आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबासोबत जोडले.

यामध्ये ५३५ मुले आणि ३२९ मुलींचा समावेश आहे जे एकतर घरातून पळून गेले होते किंवा हरवले होते आणि आरपीएफने तिकीट तपासणी कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस, चाइल्डलाइन एनजीओ आणि प्रवाशांच्या मदतीने ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या आवारात सापडले होते.

यातील बहुतेक मुले काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर आली होती. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

मध्य रेल्वेवर जानेवारी ते नोव्हेंबर- २०२१ पर्यंत सुटका केलेल्या (शोधलेल्या) मुलांचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे :

मुंबई विभाग ३२२ मुले (१९४ मुले आणि १२८ मुली)

पुणे विभाग ३०६ मुले (२१२ मुले व ९४ मुली)



भुसावळ विभाग १२८ मुले (७७ मुले व ५१ मुली).

नागपूर विभाग ६६ मुले (२८ मुले व ३८ मुली).

सोलापूर विभाग ४२ मुले (२४ मुले व १८ मुली).

मध्य रेल्वेवर नोव्हेंबर-२०२१ महिन्यात ५० मुले आणि २९ मुलींसह एकूण ७९ मुलांची सुटका करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र करण्यात आले.

मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आणि अशा प्रकरणांची माहिती कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचार्यांना किंवा जवळच्या चाइल्डलाइन एनजीओकडे किंवा हेल्पलाइन नंबर 1098 वर डायल करा आणि त्याद्वारे हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्यास मदत करण्याचे आवाहन करीत आहे.


Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित