योगियांचे योगी

सिंधुदुर्ग जिल्हा ही अध्यात्माची भूमी. या भूमीत अनेक संत, महंत, तपस्वी होऊन गेलेत. माणगावचे प.पू. टेंबे स्वामी महाराज, कुडाळ पिंगुळीचे प.पू. राऊळ महाराज, सावंतवाडी दाणोलीचे प.पू. साटम महाराज यांच्याप्रमाणेच कणकवलीचे प.पू. भालचंद्र महाराज यांनी आध्यात्म रुजविला. समाजाला नवी दिशा दिली. पद्मनाभ हनुमंत पाटील यांनी लिहिलेल्या ‘योगियांचे योगी’ या प.पू. भालचंद्र बाबांच्या जीवनचरित्राचा आधार घेऊन ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

प्रभू परशुरामाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण परिसरात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात पाया नावाचे एक लहानसे गाव आहे. त्या गावात परशुराम ठाकूर नावाचे एक कुडाळ देशस्थ ब्राह्मण राहात असत. त्यांना ८ जानेवारी १९०४ रोजी मुलगा झाला. त्या तेज:पुंज बालकाचे नाव भालचंद्र असे ठेवण्यात आले. वास्तविक ठाकूर हे मूळ वेंगुर्ले तालुक्यातील मु. म्हापण गावचे रहिवासी होत. त्यांचा मूळ पुरुष महान शिवभक्त होता. सुमारे २०० वर्षांपूर्वी सदाशिव नावाचा सदाचरसंपन्न असलेला शिवभक्त रोज आडवे गंध कपाळाला लावीत असे. त्याने आपले सारे आयुष्य अशा व्रतांत व महान शिवभक्तीत घालविले आणि शेवटी तो सद्गतीस गेला. अशा त्या साक्षात्कारी महापुरुषाच्या वंशातीलच परशुराम ठाकूर हे होत. ते परमेश्वराचे पूजक असल्याने आपली नोकरी अगदी प्रामाणिकपणे सांभाळीत असत.

बाल भालचंद्र हा उपजतच परमेश्वराचा भक्त होता. तो शेजारच्या मुलांबरोबर लहान-लहान दगड गोळा करून त्यांच्यावर फुले वाहून त्यांची पूजा करीत असे. बोबड्या बोलानी भजन करीत असे. कारण त्याच्या कोवळ्या मनावर घरातील सुसंस्काराची आणि आचार धर्माची चांगलीच छाप पडली होती. भालचंद्र पाच-सहा वर्षांचा असताना त्याच्यावर जणू दु:खाचा कडाच कोसळल्यासारखा झाले. त्याचे आई-वडील लागोपाठ चार-दोन वर्षांत स्वर्गवासी झाले. भालचंद्र बालवयातच पोरका झाला. त्यावेळी तो पहिलीच्या वर्गात शिकत होता. त्या चिमण्या बालकाला आपल्या मातापिता वियोगाचे अतिशय दु:ख झाले. अशा घोर परिस्थितीत त्याच्या चुलत चुलत्याने त्याला गावी मु. म्हापण येथे आणले व तिथल्या प्राथमिक शाळेत त्याला दाखल केले.

मातृभाषेचे शिक्षण गावात पुरे झाल्याने आंग्ल शिक्षणासाठी त्याची रवानगी पुन्हा मुंबईला झाली. मु. वसईला त्याची मावशी राहात असे. तिच्याजवळ राहून वाघ हायस्कूलमध्ये तो मॅट्रिकपर्यंत शिकला. तो विद्यार्थीदशेत असताना ‘मानवता’ हा जगातील एक थोर धर्म जो समजला जातो त्यांची पाळे त्याच्या पवित्र हृदयांत फार खोलवर रुतली होती आणि त्या अशा थोर गुणामुळे तो त्यावेळी फार लोकप्रिय झाला होता. एक सुसंस्कारी व आदर्श विद्यार्थी अशी त्याची अखंड वसईत ख्याती झाली होती.
Comments
Add Comment

Surya Grahan 2026: दुर्मीळ योग! माघ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी; काय खावे आणि काय टाळावे?, जाणून घ्या...

मुंबई: खगोलीय घटनांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण

Solar Eclipse: १७ फेब्रुवारीला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि दिवसभरात कोणत्या चूका टाळाव्यात?

मुंबई: खगोलशास्त्र आणि धार्मिक परंपरांमध्ये रस असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. या

MahaShivratri 2026: महाशिवरात्री पूजेनंतर वापरलेल्या साहित्याचे काय करावे?, विसर्जनाची योग्य पद्धत जाणून घ्या...

मुंबई: महाशिवरात्री पूजा संपताच मनात विचार येतो की, पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे काय करावे? ते कचऱ्यात

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Sankashti Chaturthi Feb 2026: माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी 5 फ्रेब्रुवारीला, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ