मुंबईत न्यायाधीशांची मोठी कमतरता

प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी लागणार ३० वर्षे



मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत न्यायाधीशांची मोठी कमतरता आहे. २०२० अखेरपर्यंत मुंबईत ७६,८४१ प्रकरणे प्रलंबित होती. गेल्या पाच वर्षांतील सरासरी पूर्ण झालेल्या ट्रायल्सचा विचार केल्यास मुंबईतील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ३० वर्षे आणि तीन महिने लागतील, असे प्रजा फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.


या अनुशेषाला आणखी एक कारणीभूत घटक म्हणजे, अशा केसेस हाताळणारे वकील आणि न्यायाधीशांची ३० टक्के कमतरता आहे, असे अहवालात म्हटले आहे. ‘क्राइम इन इंडिया’ या शीर्षकाखाली करण्यात आलेल्या अभ्यासात २०१६ ते २०२० या कालावधीतील कायदेशीर प्रकरणांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.


नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि फाऊंडेशनने मिळवलेल्या आरटीआय डेटा तसेच अभ्यासात असे दिसून आले आहे की, शहरात प्रलंबित गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढत असताना, तुलनेने अशा प्रकरणांचे ट्रायल्स तेवढ्याच गतीने पूर्ण केले जात नाहीत.


वृत्तपत्र समूहाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, एनसीआरबी डेटा विश्लेषणानुसार, २०१६-२०२० दरम्यान सरासरी २५५० केसेसचे ट्रायल्स पूर्ण झाले आहेत आणि त्यामुळे खटले जर या गतीने चालू राहिले, तर सर्व खटले पूर्ण करण्यासाठी न्यायालयांना ३०.३ वर्षे लागतील.


“ही प्रकरणे केवळ द्वितीय श्रेणीचे गुन्हे आहेत, ज्यांचा खटला दोन सत्र न्यायालयात (काळाघोडा आणि दिंडोशी) आणि शिवरी जलदगती न्यायालयात चालतो. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, निष्काळजीपणामुळे मृत्यू, अनैसर्गिक गुन्हा, गर्भपात, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अपहरण, गंभीर दुखापत, विषप्रयोग, सार्वजनिक सेवकावर हल्ला आणि दुखापत. या गुन्ह्यांचा वर्ग दोनच्या गुन्ह्यांच्या श्रेणीमध्ये समावेश होतो.

Comments
Add Comment

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि