आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ जानेवारीपर्यंत बंदच

  109

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय उड्डाणे २१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) जारी केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी २३ मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद करण्यात आली आहे.


देशातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे सरकारने १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळून आल्यामुळे आणि भविष्यातील संभव्य धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणे अनिर्वाय असणार आहे.


दरम्यान, डीजीसीएने आदेशात स्पष्ट केले आहे की हे निर्बंध सर्व मालवाहू उड्डाणे आणि विशेष मान्यताप्राप्त उड्डाणांसाठी नाहीत. कोविड-19 चा धोका लक्षात घेता २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. प्राधिकरणाने म्हटले आहे की, विशिष्ट मार्गांसाठी अनुसूचित आंतरराष्ट्रीय उड्डाणे केसच्या आधारावर मंजूर केली जाऊ शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सोबतच, सर्व विमानतळ चालकांना पाठवलेल्या या आदेशाचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.


कोरोना महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. नंतर, गेल्या वर्षी जुलैपासून, सुमारे २८ देशांसह बायो बबल व्यवस्था अंतर्गत उड्डाणे मंजूर करण्यात आली. सध्या भारताची ३२ देशांसोबत बायो बबल व्यवस्था आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.