आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ जानेवारीपर्यंत बंदच

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय उड्डाणे २१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) जारी केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी २३ मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद करण्यात आली आहे.


देशातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे सरकारने १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळून आल्यामुळे आणि भविष्यातील संभव्य धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणे अनिर्वाय असणार आहे.


दरम्यान, डीजीसीएने आदेशात स्पष्ट केले आहे की हे निर्बंध सर्व मालवाहू उड्डाणे आणि विशेष मान्यताप्राप्त उड्डाणांसाठी नाहीत. कोविड-19 चा धोका लक्षात घेता २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. प्राधिकरणाने म्हटले आहे की, विशिष्ट मार्गांसाठी अनुसूचित आंतरराष्ट्रीय उड्डाणे केसच्या आधारावर मंजूर केली जाऊ शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सोबतच, सर्व विमानतळ चालकांना पाठवलेल्या या आदेशाचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.


कोरोना महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. नंतर, गेल्या वर्षी जुलैपासून, सुमारे २८ देशांसह बायो बबल व्यवस्था अंतर्गत उड्डाणे मंजूर करण्यात आली. सध्या भारताची ३२ देशांसोबत बायो बबल व्यवस्था आहे.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला