बोईसरच्या सेवा आश्रम शिक्षण संस्थेत बोगस शिक्षक भरती?

संदीप जाधव


बोईसर : बोईसर येथील सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या सहा शाळांमध्ये बोगस भरती प्रक्रिया राबवून शिक्षकांची नेमणूक केल्याची तक्रार जि. प. पालघर शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.


सेवा आश्रम शिक्षण संस्था मुरबे यांच्या बोईसर परिसरात ६ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू असून या ठिकाणी आवश्यक शिक्षक भरती करताना कोणत्याही प्रकारे जाहिरात न प्रसिद्ध करता तसेच शासनाच्या विहीत प्रक्रियेप्रमाणे मुलाखत न घेताच बिंदू नामावलीनिहाय बोगस शिक्षक भरती केल्याची तक्रार विक्रम धोडी यांनी पालघर जिल्हा परिषदेकडे केली असून तत्काळ ही भरती थांबवण्याची मागणी केली आहे.


पालघर हा पेसा जिल्हा असल्यामुळे भरती प्रक्रिया राबवताना सर्व जातीनिहाय आरक्षण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असताना सेवा आश्रम शिक्षण संस्थेचे फिट पर्सन समाधान सूर्यवंशी, व्ही. जी. पाटील आणि प्रकाश बापिस्कर यांनी कोरोना महामारी काळात कोणत्याही प्रकारे शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध न करताच उमेदवारांकडून लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण करून बोगस शिक्षक भरती राबवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व बोगस शिक्षक भरती प्रक्रियेत सेवा आश्रम शाळा बोईसरचे मुख्याध्यापक रविंद्र अनंत पिंपळे यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


संस्थेमार्फत जि. प. पालघर यांच्याकडे जे शिक्षक भरतीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत ते बोगस असल्याने सदर प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी विक्रम धोडी यांनी केली आहे. तसेच केलेली बोगस शिक्षक भरती थांबवण्यात येऊन यामध्ये सामील असणाऱ्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.





Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित