रत्नागिरी : दुचाकी वाहन चालवताना चालकांकडे हेल्मेट नसल्यास लायसन्सच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेत केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्राच्या सुधारित मोटर वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हात विना लायसन्स वाहन चालवणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हेल्मेट न घातल्यास दुचाकी वाहन चालवणाऱ्यांचे लायसन्स देखील रद्द होणार आहे. राज्यात, जिल्ह्यात अपघातांमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. याची दखल घेत राज्याने सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार आता हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंडासह तीन महिन्यांसाठी लायसन्स देखील रद्द केले जाणार आहे. या व्यतिरिक्त विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचे देखील लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. वाहन क्रमांकाशी छेडछाड करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…