“न्यायालयाने ‘मविआ’ सरकारला कितीही फटकारले तरी..”

मुंबई : “न्यायालयाने मविआ सरकारला कितीही फटकारले तरीही गेंड्यालाही लाज आणेल इतक्या निब्बर कातडीच्या या सरकारवर त्याचा जराही परिणाम होत नाही.” असे ट्विट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.


कोरोना महामारीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने केवळ मदत जाहीर केली, मात्र प्रत्यक्षात कुणालाही मदत मिळाली नाही, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, विविध मुद्य्यांवरून न्यायालयाकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर देखील चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला.


तसेच, “संवेदनाशून्य मविआ सरकारने कोरोनासारख्या भीषण संकटात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले, यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची अतोनात परवड झाली. या सरकारच्या ढिम्म कारभारामुळेच महाराष्ट्रातील १ लाख ४० हजारांपेक्षा अधिक नागरिक कोरोनाला बळी पडले; परंतु सरकारला याची जराही लाज वाटत नाही.” असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


“कोरोनामुळे निधन पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा आदेश झाला आहे, अशा मदतीसाठी तब्बल ३७ हजार गरजू कुटुंबांनी राज्य सरकारकडे अर्ज दाखल केले आहेत. बोलघेवड्या मविआ सरकारने केवळ दाखवण्यापुरती मदत जाहीर केली, परंतु कोणालाही प्रत्यक्षात मदत केली नाही.” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.


याचबरोबर, “इतर अनेक प्रकरणांप्रमाणेच आता सर्वोच्च न्यायालयाने याही बाबतीत ढिम्म सरकारवर ताशेरे ओढले आहेत, पण कुठल्याही बाबतीत न्यायालयाने मविआ सरकारला कितीही फटकारले तरीही गेंड्यालाही लाज आणेल इतक्या निब्बर कातडीच्या या सरकारवर त्याचा जराही परिणाम होत नाही.” असे चंद्रकांत पाटील ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.