विकासापासून वंचित ठेवणाऱ्या खासदार, आमदारांवर बहिष्कार घाला

Share

लांजा (प्रतिनिधी) : कायमच भावनिक राजकारण करून निवडून येऊन मग विकासाची पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना हद्दपार करा. प्रसंगी त्यांच्यावर बहिष्कार घाला, असे आवाहन भाजप प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी रिंगणे कोंडगे येथे बोलताना केले.

रिंगणे कोंडगे येथील कोंगडे गुरववाडी ते स्मशानभुमीकडे जाणाऱ्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेल्या रस्त्याचा शुभारंभ रविवारी निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, लांजा तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर, महिला आघाडी नेत्या उल्का विश्वासराव, संजय आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याने हा रस्ता पूर्णत्वाला गेला आहे. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळ माने व या महिला नेत्या उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नाने हा रस्ता मार्गी लागला आहे.

या प्रसंगी बोलताना निलेश राणे यांनी भाजपच्या माध्यमातूनच विकास होऊ शकतो, असे नमूद करत भविष्यातही तुम्ही दिलेली कामे आम्ही नक्कीच मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. मात्र ज्यांना जनतेने निवडून दिले ते शिवसेनेचे आमदार आणि खासदार काय करतातय? असा खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला. आमदारांना चार कोटी आणि खासदारांना पाच कोटींचा विकास निधी वर्षाला मिळतो यातील तुमच्या गावासाठी किती निधी त्यांनी दिला? याचा विचार करा असे राणे म्हणाले.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

6 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

32 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

1 hour ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago