मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ६९९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रुग्ण बरे होत असताना मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सोमवारी राज्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी यामध्ये थोडी वाढ झाली असून राज्यात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत ६४ लाख ८८ हजार ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के झाले आहे. आजपर्यंत राज्यात १ लाख ४१ हजार १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के झाले आहे. सध्या राज्यामध्ये ६ हजार ४४५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ६२ लाख ५५ हजार ५५४ प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ६६ लाख ३९ हजार ९९५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या राज्यात ७७ हजार ६४२ जण होम क्वारंटाईन आहेत. तर ८९६ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…