शाळांबाबत ओमायक्रॉनच्या परिस्थितीनुसार पुढील निर्णय - वर्षा गायकवाड

  67

मुंबई : मुंबई, पुण्यात १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण केले जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली आहे. त्यामुळे शाळांबाबत येत्या चार-पाच दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

गायकवाड पुढे म्हणाल्या की, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र, लहान मुलांचे आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.




तिसऱ्या लाटेलाही थोपवू - मुंबई महापौर




 मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, शाळांबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वाट पाहावी लागेल. आपण तिसऱ्या लाटेला थोपवू.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूमुळे राज्यात शाळा, महाविद्यालये बंद होती. ती काही दिवसांपासून हळूहळू पूर्ववत सुरू होतं असताना आता ओमाक्रॉन बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार का याबाबत पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण