शाळांबाबत ओमायक्रॉनच्या परिस्थितीनुसार पुढील निर्णय - वर्षा गायकवाड

मुंबई : मुंबई, पुण्यात १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण केले जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली आहे. त्यामुळे शाळांबाबत येत्या चार-पाच दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

गायकवाड पुढे म्हणाल्या की, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र, लहान मुलांचे आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.




तिसऱ्या लाटेलाही थोपवू - मुंबई महापौर




 मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, शाळांबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वाट पाहावी लागेल. आपण तिसऱ्या लाटेला थोपवू.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूमुळे राज्यात शाळा, महाविद्यालये बंद होती. ती काही दिवसांपासून हळूहळू पूर्ववत सुरू होतं असताना आता ओमाक्रॉन बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार का याबाबत पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त